शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:47 IST

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.

ठळक मुद्दे१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.यासंदर्भात सकाळी शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौक, शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक चौकातून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.त्यात म्हटले आहे की, शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रस्त्याच्या मध्यभागीच खाकी पोलीस तसेच वाहतूक पोलीस आडवे येत आहेत. कागदपत्र तपासणीसाठी मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, सक्तीने दंडाची वसुली असे प्रकार घडत आहेत.पोलीस निरीक्षक काळे, कदम, हवालदार परदेशी हे अधिकारी प्रामुख्याने नागरिकांना त्रास देत असून, टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे सारे प्रकार करावे लागत असल्याचे नागरिकांना सांगत आहेत. या मोर्चात शिवसेनेचे शिवाजी भोर, रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, मनसेचे भय्या मनियार, भाजपाचे भगवंत पाठक, हैदर सय्यद यांच्यासह सखाराम गोपाळ, मुरली घोरपडे, मामा राजवाडे, नितीन पवार यांच्यासह शेकडो वाहनचालक सहभागी झाले होते. पोलीसांची दडपशाही न्यायालयाची दिशाभूल करून रिक्षा व टॅक्सी चालकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत. जाब विचारणाºया राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.२ पोलिसांची अशीच दडपशाही सुरू राहिल्यास अराजकता माजण्यास वेळ लागणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी थांब्याचे फलक लावावेत, वाहन पार्किंग, नो पार्किंग झोनचे फलक लावावे, थांब्यांचे तत्काळ सर्वेक्षण करावे, शहरातील ६८६ रिक्षा आरटीओने अडकून ठेवल्या आहेत, त्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.