शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:47 IST

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.

ठळक मुद्दे१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.यासंदर्भात सकाळी शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौक, शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक चौकातून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.त्यात म्हटले आहे की, शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रस्त्याच्या मध्यभागीच खाकी पोलीस तसेच वाहतूक पोलीस आडवे येत आहेत. कागदपत्र तपासणीसाठी मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, सक्तीने दंडाची वसुली असे प्रकार घडत आहेत.पोलीस निरीक्षक काळे, कदम, हवालदार परदेशी हे अधिकारी प्रामुख्याने नागरिकांना त्रास देत असून, टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे सारे प्रकार करावे लागत असल्याचे नागरिकांना सांगत आहेत. या मोर्चात शिवसेनेचे शिवाजी भोर, रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, मनसेचे भय्या मनियार, भाजपाचे भगवंत पाठक, हैदर सय्यद यांच्यासह सखाराम गोपाळ, मुरली घोरपडे, मामा राजवाडे, नितीन पवार यांच्यासह शेकडो वाहनचालक सहभागी झाले होते. पोलीसांची दडपशाही न्यायालयाची दिशाभूल करून रिक्षा व टॅक्सी चालकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत. जाब विचारणाºया राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.२ पोलिसांची अशीच दडपशाही सुरू राहिल्यास अराजकता माजण्यास वेळ लागणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी थांब्याचे फलक लावावेत, वाहन पार्किंग, नो पार्किंग झोनचे फलक लावावे, थांब्यांचे तत्काळ सर्वेक्षण करावे, शहरातील ६८६ रिक्षा आरटीओने अडकून ठेवल्या आहेत, त्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.