शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

२ लाख १६ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:12 IST

नाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (दि. ३) दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रांवर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली.

ठळक मुद्देनाशिक विभाग : दहावीची ४४५ कें द्रे, २०२ केंद्रांवर ९८ हजार प्रविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (दि. ३) दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रांवर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली.विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी दहावीची परीक्षा अवघ्या अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शिक्षण मंडळाची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तणावमुक्त परीक्षेसाठी राज्य मंडळाने नियुक्त केलेल्या दहा समुपदेशकांशिवाय विभागीय मंडळाने स्वतंत्ररीत्या अतिरिक्त चार समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व समुपदेशक विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव व दडपण कमी करण्यासाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. कॉपीमुक्तीसाठी बैठकबारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरदरम्यान जळगावातील भडगाव येथील परीक्षा कें द्रावर उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रती तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला होता. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेत विभागातून जळगावमध्येच सर्वाधिक गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे विभागीय मंडळाने जळगाव जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने रविवारी (दि.१) जळगावी सर्व केंद्र संचालकांची बैठक बोलावली असून, विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी हे सर्व केंद्र संचालकांना मार्गदर्शन करणार आहेत.जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा केंद्र विद्यार्थी परीरक्षकनाशिक २०२ ९७,९३४ २६धुळे ६३ ३१,८३७ ०८नंदुरबार ४६ २२,६०३ ०७जळगाव १३४ ६४०७० १८एकूण ४४५ २,१६,४४४ ५९

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी