शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

निर्जन जागेसाठी ३२ कोटींचे पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:02 IST

ज्या भागात ले-आउट पाडून घरे बांधली गेली आणि लोकही राहण्यास आले आहेत तेथे ५० टक्के लोकवस्ती नाही म्हणून साधे खडीचे रस्तेही तयार करणाऱ्या मनपाने आता मात्र गोदावरीच्या सर्व शेत आणि माळरान असताना ३२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे घाटत असून, त्यामुळे संशयाचे वलय निर्माण झाले आहे.

नाशिक : ज्या भागात ले-आउट पाडून घरे बांधली गेली आणि लोकही राहण्यास आले आहेत तेथे ५० टक्के लोकवस्ती नाही म्हणून साधे खडीचे रस्तेही तयार करणाऱ्या मनपाने आता मात्र गोदावरीच्या सर्व शेत आणि माळरान असताना ३२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे घाटत असून, त्यामुळे संशयाचे वलय निर्माण झाले आहे. दरम्यान, या दोन पुलांमुळे पुराचा धोका आणखी वाढेल अशी भीती आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. त्यातच आणखी दोन पूल महापालिका बांधणार असून, नुकत्याच झालेल्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव विनाचर्चाच मंजूर करण्यात आला. परीचा बाग तसेच शहीद चित्ते पुलाजवळ दोन पूल बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे. महापालिकेने यापूर्वीदेखील अशाच प्रकारे नदीच्या पल्याड दहा कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. त्याठिकाणी कोणतीही वस्ती नसतानादेखील रस्ता केल्याने त्यावरदेखील टीका त्यावेळी झाली होती. आता विकास आराखड्यात दाखवलेला रस्ता जोडण्याच्या नावाखाली हे दोन पूल बांधले जात आहे. विशेष म्हणजे नियोजित पुलाच्या दोन्ही बाजूने कोणताही रस्ता विकसित झालेला नाही अशावेळी महापालिका अट्टाहास हा चर्चेचा विषय ठरला आहे. फॉरेस्ट नर्सरी आणि आसारामबापू पूल अशा दोन पुलांमध्ये हे दोन पूल बांधून अशी कोणती वाहतूक या मार्गावरून सुरू होणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अनेक भागात मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी प्रशासन निधी नसल्याचे नाव पुढे करते, मग ३२ कोटींची उधळपट्टी कोणासाठी केली जात आहे? असादेखील प्रश्न केला जात आहे. परीचा बाग येथील नियोजीत पुल बांधल्यास समोर कुसुमाग्रज काव्य उद्यान असून तेही हटवावे लागण्याची शक्यता आहे. नगरसेवक कामे सूचवतात, खेड्यांसाठी किंवा तत्सम कामे सांगतात, त्यावेळी प्रशासन निधी नसल्याचे सांगत असते, मात्र आता मनपाकडे ज्या भागात लोकच राहत नाही, अशा भागासाठी कोट्यवधी रूपये कसे काय उपलब्ध होतात असा प्रश्न नगरसेवक उपस्थित करीत आहेत.पुराचा धोका वाढणारसदरचे पूल झाल्यास नदी प्रवाहाला अडथळा वाढणार आहे. त्यामुळे पूर पातळी अडीच मीटरने वाढणार असून त्यामुळे आयाचितनगर, भगूरकर मळा, अशा अनेक भागांतदेखील आता पाणी जाऊ शकते, तर नदीकाठच्या आणखी इमारतीत तिसºया चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जाईल अशी भीती आमदार फरांदे यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेला दोन नवीन पूल बांधायचे असतील तर अगोदरचे दोन पूल पाडा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी