शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अतिवृष्टीग्रस्तांसाठी १८१ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:17 IST

जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

ठळक मुद्देजमीन महसुलात सूट : दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राची अट

नाशिक : जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.विशेष म्हणजे हे अनुदान दोन हेक्टरच्या आतील व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांनाच देण्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याने ३३ टक्क्यांपेक्षा कमी आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांना याचा फायदा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्णातील ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, कांदा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.यात वार्षिक फळपिकांखालील ४१८ हेक्टर क्षेत्र बाधीत असून, त्यासाठी ५६ लाख रुपयांची मदत अपेक्षित होती, तर जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार, बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांचा मदत निधी अपेक्षित असताना शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने केवळ १८१ कोटींचीच मदत दिल्याने आता उर्वरित क्षेत्रासाठी मदत मिळणार किंवा नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.थेट बॅँक खात्यात जमा होणार रक्कमशासनाच्या महसूल व वन विभागाने आपदग्रस्तानांना मदतीबाबतचे परिपत्रक काढले असून, यात नाशिक जिल्ह्णासाठी १८१ कोटी ५० लाख ८४ हजार इतकीच मदत देण्यात आली आहे. यात शेतीपिकांसाठी ८ हजार प्रति हेक्टरी, तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी वाटप केले जाणार आहेत. दोन हेक्टरच्या आत आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांनाच ही मदत मिळणार असून, संबंधित बाधीतांच्या बँक बचत खात्यात जमा केली जाणार आहे. या मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये अशा स्पष्ट सूचना परिपत्रकातून करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बाधीत गावांना या जमीन महसुलात सूट देण्यासोबतच शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याच्या सूचनाही या पत्रकातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी