शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

मनोज शेलार जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ११ जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत ...

मनोज शेलार

जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ११ जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत समिती सदस्यांच्या रद्द झालेल्या जागांवर आणखी दोन महिने निवडणुका होणार नसल्याने या सदस्यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सदस्यत्व रद्द झाल्यामुळे या सदस्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कुठल्याही कामकाजात सहभागी होता येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे या सदस्यांसह त्यांचे कार्यकर्तेही दिसून येत असून निवडणुका कधी होतात, न्यायालयात दाखल पुनर्विचार याचिकांसदर्भात काय निर्णय होतो याकडे या सदस्यांचे लक्ष लागून आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेचे ११ तर नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा पंचायत समितीचे एकूण १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या दिवसापासूनच त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये सर्वाधिक सात सदस्य हे भाजपचे आहेत तर काँग्रेसचे व शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. पंचायत समिती सदस्यांमध्ये भाजपचे आठ, काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन व अन्य एका सदस्याचा समावेश आहे. जि.प. सदस्यांपैकी एक उपाध्यक्ष व दोन सभापतींचा समावेश आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदाचा तथा इतर समिती सभापतींकडील समितींचा भारही अध्यक्षांकडे आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे राजकारण ठप्प झाले आहे. अर्थात महिनाभरापासून कोरोनाने हाहाकार उडवून दिल्यामुळे काहीशी शांतता आहे तेवढेच.

गेल्या आठवड्यात कोरोनामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रिक्त जागांवर किमान दोन महिने निवडणुका घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. असे असले तरी निवडणूक आयोगाने या जागांच्या निवडणुकांची तयारी सुरू करून दिली आहे. या गटातील महिला आरक्षण निश्चित झाले आहे. प्रारूप मतदार यादी तयार झाली असून तिच्यावर हरकती व सुनावणी होऊन प्रसिद्धही करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधी होते याकडे लक्ष लागलेले असतांनाच दोन महिने निवडणुका न घेण्याचे आदेश आले. त्यामुळे प्रतीक्षा अजून वाढली आहे. त्यामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे राजकारण पहाता येथे सत्तेचे भागीदार सर्वच राजकीय पक्ष आहेत. काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी २३ सदस्य आहेत. शिवसेनेने आपल्या सात सदस्यांसह काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष विराजमान झाले. तडजोडीच्या राजकारणात भाजपचा एक सदस्य सभापती झाला तर अन्य अर्थात तीन सभापती हे काँग्रेसचे झाले. तीन सदस्यांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत एकत्रित गट स्थापन केलेला आहे. त्यामुळे एकूण चित्र पाहता जिल्हा परिषदेत कुणीच विरोधी पक्ष नव्हता, असे चित्र होते. असे असले तरी जिल्हा परिषदेतील राजकारण मात्र शांत राहिले नाही. वर्षभराच्या काळात अनेक वादविवाद झाले. दालनाची भिंत पाडण्याचे राजकारण असो, काँग्रेसच्या सभापतींकडून महत्त्वाचे बांधकाम व अर्थ विषय समिती काढून ते उपाध्यक्षपद असलेल्या सेनेकडे देणे असो किंवा वित्त आयोगाच्या निधीचे वितरण असो वादविवाद व राजकारण काही थांबलेले नव्हते.

कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याच्या घोषणेमुळे हा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुका कधी होतील. झाल्याच तर काय राजकीय चित्र असेल, रद्द झालेले गट हे सर्वसाधारण झाल्याने निवडणूक लढणाऱ्यांची किती आणि कशी भाऊगर्दी असेल?, राजकीय समझोते होतील की निवडणुका लढविल्या जातील यासह अनेक प्रश्नांची उत्तरे हे येणारा काळच देणार आहे. परंतु निवडून येऊन अवघ्या वर्षभरातच सदस्यत्व रद्द झाल्यामुळे जीव टांगणीला असलेल्या सदस्यांना आणखी काही दिवस जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दरवाजे बंद राहणार आहेत हे तेवढेच खरे.