शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील तरूण एकवटले असून, या तरूणांनी  येथील महसूल प्रशासनाची भेट घेऊन शासकीय विहिरी व कुपनलिकांमध्ये जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेकडे कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.एकेकाळी पाण्यासाठी संपूर्ण तळोदा तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. कारण अवघ्या 20 ते 25 फुटावर पाणी होते. तथापि, अलिकडच्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने पजर्न्यमानात घट होत असल्यामुळे तळोदा वासियांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे शहराबरोबरच तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भीषण दुष्काळाची परिस्थिती          निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीबाबत सर्व सामान्यांमध्ये चर्चा होत असतांना दिसून येत आहे. माळी समाजातील तरूण वर्गाने तर सर्वाच्या सहकार्यातून नदी नांगरटी आणि खोलीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. साहजिकच इतर तरूणांनीदेखील भविष्यात दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून पावसाचे वाया जाणा:या पाण्यातून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तरूणांनी गुरूवारी               नायब तहसीलदार रामजी राठोड             यांची भेट घेतली होती. त्यांनी शहरातील विविध शासकीय              विहिरी व कुपनलिका पुनर्भरण करण्याची भावना बोलून दाखविली. विशेषत: मोठा माळीवाडय़ातील डॉ.मगरे यांच्या घरासमोर  15 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवकांनी बोअरवेल केलेली आहे. त्या शेजारीच नगरपरिषदेची जुनी विहीर असून, त्यावर सद्याच्या परिस्थितीत सिमेंट क्राँक्रिटचा स्लॅब टाकून विहीर बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या कुपनलिकेची पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे ती निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागून असलेल्या शेजारच्या विहिरीत लोकसहभागातून रेनवॉटर हाव्रेस्टींगसारखा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, पावसाचे पाणी सोडण्याकामी विहीर मोकळी करून द्यावी, अशी मागणी चंद्रकांत रामदास मगरे, दीपक राजाराम देवरे, हेमलाल धरमदास माळी, अनिल रमेश शिंपी, नीलेश धरमदास माळी, मनोज दगडू सूर्यवंशी, डॉ.सुहास गोविंद राणे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमिवर संपूर्ण शहरवासी एकवटून लोकसहभागातून व लोकवर्गणीतून गेल्या आठ ते दहा दिवसांपासन अहोरात्र जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करीत आहेत. विशेषत: तरूणवर्ग यात अधिक सक्रीय आहेत. त्यांचा उत्साह पाहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक ग्रुप, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून आर्थिक मदत करीत आहेत. मात्र प्रशासनातील सर्वच यंत्रणातील अधिका:यांना कामाच्या ठिकाणी साधी भेट देण्यास वेळ मिळू नये असा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी परिस्थतीबाबत अधिका:यांच्या असंवेदनशीलतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन वेगवेळ्या उपाययोजना राबवित आहे. प्रशासन या उपाययोजनांना तर सोडा नागरिक स्वत:हून लोसहभागातून लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे अपेक्षीत असतांना साधी विचारपूस केली नसल्याचे कार्यकत्र्याचे म्हणणे आहे. याउलट जिल्हा प्रशासनाने कामासाठी नाम फाऊंडेशनचे पोकलेन यंत्र उपलब्ध करून देवून कामांबाबत कार्यकत्र्याशी संवादही साधत आहेत.  एवढेच  नव्हे तर पुढील दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कामावर येवून भेट देण्याचेही कार्यकत्र्याना आश्वासीत केले आहे.