शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील तरूण एकवटले असून, या तरूणांनी  येथील महसूल प्रशासनाची भेट घेऊन शासकीय विहिरी व कुपनलिकांमध्ये जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेकडे कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.एकेकाळी पाण्यासाठी संपूर्ण तळोदा तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. कारण अवघ्या 20 ते 25 फुटावर पाणी होते. तथापि, अलिकडच्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने पजर्न्यमानात घट होत असल्यामुळे तळोदा वासियांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे शहराबरोबरच तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भीषण दुष्काळाची परिस्थिती          निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीबाबत सर्व सामान्यांमध्ये चर्चा होत असतांना दिसून येत आहे. माळी समाजातील तरूण वर्गाने तर सर्वाच्या सहकार्यातून नदी नांगरटी आणि खोलीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. साहजिकच इतर तरूणांनीदेखील भविष्यात दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून पावसाचे वाया जाणा:या पाण्यातून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तरूणांनी गुरूवारी               नायब तहसीलदार रामजी राठोड             यांची भेट घेतली होती. त्यांनी शहरातील विविध शासकीय              विहिरी व कुपनलिका पुनर्भरण करण्याची भावना बोलून दाखविली. विशेषत: मोठा माळीवाडय़ातील डॉ.मगरे यांच्या घरासमोर  15 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवकांनी बोअरवेल केलेली आहे. त्या शेजारीच नगरपरिषदेची जुनी विहीर असून, त्यावर सद्याच्या परिस्थितीत सिमेंट क्राँक्रिटचा स्लॅब टाकून विहीर बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या कुपनलिकेची पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे ती निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागून असलेल्या शेजारच्या विहिरीत लोकसहभागातून रेनवॉटर हाव्रेस्टींगसारखा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, पावसाचे पाणी सोडण्याकामी विहीर मोकळी करून द्यावी, अशी मागणी चंद्रकांत रामदास मगरे, दीपक राजाराम देवरे, हेमलाल धरमदास माळी, अनिल रमेश शिंपी, नीलेश धरमदास माळी, मनोज दगडू सूर्यवंशी, डॉ.सुहास गोविंद राणे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमिवर संपूर्ण शहरवासी एकवटून लोकसहभागातून व लोकवर्गणीतून गेल्या आठ ते दहा दिवसांपासन अहोरात्र जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करीत आहेत. विशेषत: तरूणवर्ग यात अधिक सक्रीय आहेत. त्यांचा उत्साह पाहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक ग्रुप, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून आर्थिक मदत करीत आहेत. मात्र प्रशासनातील सर्वच यंत्रणातील अधिका:यांना कामाच्या ठिकाणी साधी भेट देण्यास वेळ मिळू नये असा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी परिस्थतीबाबत अधिका:यांच्या असंवेदनशीलतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन वेगवेळ्या उपाययोजना राबवित आहे. प्रशासन या उपाययोजनांना तर सोडा नागरिक स्वत:हून लोसहभागातून लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे अपेक्षीत असतांना साधी विचारपूस केली नसल्याचे कार्यकत्र्याचे म्हणणे आहे. याउलट जिल्हा प्रशासनाने कामासाठी नाम फाऊंडेशनचे पोकलेन यंत्र उपलब्ध करून देवून कामांबाबत कार्यकत्र्याशी संवादही साधत आहेत.  एवढेच  नव्हे तर पुढील दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कामावर येवून भेट देण्याचेही कार्यकत्र्याना आश्वासीत केले आहे.