शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील तरूण एकवटले असून, या तरूणांनी  येथील महसूल प्रशासनाची भेट घेऊन शासकीय विहिरी व कुपनलिकांमध्ये जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेकडे कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.एकेकाळी पाण्यासाठी संपूर्ण तळोदा तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. कारण अवघ्या 20 ते 25 फुटावर पाणी होते. तथापि, अलिकडच्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने पजर्न्यमानात घट होत असल्यामुळे तळोदा वासियांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे शहराबरोबरच तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भीषण दुष्काळाची परिस्थिती          निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीबाबत सर्व सामान्यांमध्ये चर्चा होत असतांना दिसून येत आहे. माळी समाजातील तरूण वर्गाने तर सर्वाच्या सहकार्यातून नदी नांगरटी आणि खोलीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. साहजिकच इतर तरूणांनीदेखील भविष्यात दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून पावसाचे वाया जाणा:या पाण्यातून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तरूणांनी गुरूवारी               नायब तहसीलदार रामजी राठोड             यांची भेट घेतली होती. त्यांनी शहरातील विविध शासकीय              विहिरी व कुपनलिका पुनर्भरण करण्याची भावना बोलून दाखविली. विशेषत: मोठा माळीवाडय़ातील डॉ.मगरे यांच्या घरासमोर  15 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवकांनी बोअरवेल केलेली आहे. त्या शेजारीच नगरपरिषदेची जुनी विहीर असून, त्यावर सद्याच्या परिस्थितीत सिमेंट क्राँक्रिटचा स्लॅब टाकून विहीर बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या कुपनलिकेची पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे ती निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागून असलेल्या शेजारच्या विहिरीत लोकसहभागातून रेनवॉटर हाव्रेस्टींगसारखा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, पावसाचे पाणी सोडण्याकामी विहीर मोकळी करून द्यावी, अशी मागणी चंद्रकांत रामदास मगरे, दीपक राजाराम देवरे, हेमलाल धरमदास माळी, अनिल रमेश शिंपी, नीलेश धरमदास माळी, मनोज दगडू सूर्यवंशी, डॉ.सुहास गोविंद राणे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमिवर संपूर्ण शहरवासी एकवटून लोकसहभागातून व लोकवर्गणीतून गेल्या आठ ते दहा दिवसांपासन अहोरात्र जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करीत आहेत. विशेषत: तरूणवर्ग यात अधिक सक्रीय आहेत. त्यांचा उत्साह पाहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक ग्रुप, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून आर्थिक मदत करीत आहेत. मात्र प्रशासनातील सर्वच यंत्रणातील अधिका:यांना कामाच्या ठिकाणी साधी भेट देण्यास वेळ मिळू नये असा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी परिस्थतीबाबत अधिका:यांच्या असंवेदनशीलतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन वेगवेळ्या उपाययोजना राबवित आहे. प्रशासन या उपाययोजनांना तर सोडा नागरिक स्वत:हून लोसहभागातून लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे अपेक्षीत असतांना साधी विचारपूस केली नसल्याचे कार्यकत्र्याचे म्हणणे आहे. याउलट जिल्हा प्रशासनाने कामासाठी नाम फाऊंडेशनचे पोकलेन यंत्र उपलब्ध करून देवून कामांबाबत कार्यकत्र्याशी संवादही साधत आहेत.  एवढेच  नव्हे तर पुढील दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कामावर येवून भेट देण्याचेही कार्यकत्र्याना आश्वासीत केले आहे.