शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सुना राहिला प्रतिकाशीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीच्या घाटावर रविवारी ऋषीपंचमीनिमित्त भाविकांऐवजी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीच्या घाटावर रविवारी ऋषीपंचमीनिमित्त भाविकांऐवजी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. तापी नदीघाट, केदारेश्वर, संगमेश्वर मंदिर, आसारामजी आश्रम, प्रकाशा बसथांबा आदी सर्व ठिकाणी बॅरिकेटींग लावण्यात आली होती. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ऋषीपंचमीनिमित्त प्रकाशा येथील तापी नदी पात्रात स्नान करण्यासाठी व दर्शनासाठी महिलांची पहाटेपासून गर्दी होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत गर्दी असते. स्नान झाल्यानंतर ब्रह्मवृंदाकडून कथा श्रवण केल्यानंतर महिला भाविक केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर मंदिरावर दर्शन घेतात. त्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच सण-उत्सवांवर बंदी आल्यामुळे शासनाने गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकाशा ग्रामपंचायतीनेही ठराव करून ऋषीपंचमीसाठी महिला भाविकांनी प्रकाशा येथे येऊ नये, असा ठराव केला होता. प्रकाशा गावातही कोरोना बाधित चार रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीने खबरादारी म्हणून हा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा पोलिसांनी शनिवारपासूनच बंदोबस्त ठेवला होता. प्रकाशा येथील बसथांबा परिसरात बॅरिकेट लावून रस्ता बंद केला होता. आसारामजी बापू आश्रमजवळून एक मार्ग संगमेश्वर मंदिराकडे जातो त्याठिकाणीही बॅरिकेट लावले होते. त्यानंतर केदारेश्वर मंदिराच्या मुख्य गेटजवळ परिसर सील केला होता. याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला. मंदिराच्या पायऱ्यांजवळ पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील तर तापी नदीघाटावर पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी पोलीस कर्मचाºयांसह बंदोबस्त ठेवला. १० पोलीस कर्मचारी व २५ महिला होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. काही भाविक आले असता त्यांना परतून लावत होते. सकाळी नंदुरबार, मंदाणे, शहादा, दोंडाईचा येथील काही भाविक रिक्षा करून आले होते. मात्र त्यांना पोलिसांनी रिक्षातून उतरू न देता परत पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहाद्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तापी नदीघाट व केदारेश्वर मंदिर परिसरात जाऊन पाहणी केली. दिवसभर मंदिर परिसरात फक्त पोलीस दिसून आले. पोलिसांना सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जे. पाटील यांनीही सहकार्य केले.

प्रकाशा येथील केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर आदी सर्वच मंदिरांना गेल्या पाच महिन्यांपासून कुलूप असल्याने मंदिर बंद आहेत. गावातील मंदिरांमध्येही शांतता होती. संगमेश्वर मंदिरावर व गौतमेश्वर मंदिरावरही भाविकांनी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याठिकाणी पोलीस असल्याने भाविकांनी परत जाणे पसंत केले. तापी नदीच्या पलिकडे ेखील पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही ४० ते ५० महिला भाविक सावळदा रस्त्याकडून स्नान करण्यासाठी एकत्र झाल्या होते. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी त्याठिकाणी जाऊन महिलांना परत पाठविले.

लोकमत’ने एक दिवस आधीच प्रकाशा ग्रामपंचायतीचा ठराव व महिला भाविकांनी येथे तापी घाटावर येऊ नये ही बातमी प्रसिद्ध केल्यामुल्ळे चांगला प्रचार-प्रसार झाला. प्रकाशा ग्रामपंचायत व पोलिसांनीही सूचना फलक तयार करून ठिकठिकाणी लावले होते. सोशल मिडियावरही याबाबत माहिती देण्यात आली होती. ऋषीपंचमी असली तरी भाविक आले नाहीत. जे भाविक आले त्यांना पोलिसांनी परत पाठविले. गणपती विसर्जनालादेखील असाच बंदोबस्त राहणार आहे. -किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा.