शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

यंदा झाले 972 बालकांचे पालकांसोबत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोजगारानिमित्त जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत सहा ते 14 वर्ष वयोगटातील 972 बालकांनी देखील स्थलांतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगारानिमित्त जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत सहा ते 14 वर्ष वयोगटातील 972 बालकांनी देखील स्थलांतर केले आहे. त्यात शहादा तालुक्यातील सर्वाधिक बालकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. बालकांचा शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील सहा ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण देण्यात येते, परंतु जिल्ह्यात फारसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने 14 वर्षार्पयतच्या मुलांचे पालक रोजगारासाठी परराज्य व राज्यांतर्गत स्थलांतर करीत आहे. मुळगावी मुलांना  सांभाळायला कोणी राहत नसल्यामुळे पालकांसोबत मुलेही स्थलांतर करीत आहे. परंतु सहा ते आठ महिने पालक मुळगावी परतत नाही, त्यामुळे बहुसंख्य बालकांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा, तालुका, केंद्र व गाव पातळीवर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या समित्यांमार्फत जिल्ह्यात सव्र्हेक्षणही करण्यात आले. या सव्र्हेक्षणात              काही जिल्ह्यातून सहा ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचे पालकांसोबत स्थलांतर झाल्याचे आढळून  आले आहेत. त्यात शहादा तालुक्यातील बालकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे देखील दिसून आले आहेत. बालकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. स्थलांतरीत झालेले व स्थलांतराची तयारी करणा:या कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक   नुकसान होऊ नये, यासाठी सव्र्हेक्षणानुसार हंगामी अनिवासी वसतिगृह सुरु करण्याचे काम शिक्षण विभागाने  सुरू केले आहे. दिवाळीच्या सुटय़ा संपल्यानंतर हंगामी वसतिगृहांसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. विद्याथ्र्याची   संख्या लक्षात घेत आवश्यकतेनुसार वसतिगृह सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात येते.या वसतिगृहांचा लाभ प्रत्येक स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना मिळणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्या बालकांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाच्या समुपदेशनानंतर स्थलांतराच्या तयारीतील 277 बालकांना थांबविण्यात आले. त्यात अक्कलकुवा तालुक्यात 86, धडगाव 40, शहादा 36, तळोदा 68, नंदुरबार 47 अशी संख्या आहे.शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 199 शाळाबाह्य बालके आढळून आली. त्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 163, अक्कलकुव्यात 33, तळोद्यात दोन तर शहाद्यात एक अशी संख्या आढळून आली आहे.