शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

यंदा अवघा 90 दिवसांचा साखर हंगाम

By admin | Updated: February 5, 2017 00:30 IST

तीनपैकी दोन कारखाने झाले बंद : ऊस पळवापळवीमुळे बसला फटका, पुढील वर्षी मुबलक ऊस

नंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगाम समारोपाकडे वाटचाल करीत आहे. सातपुडा साखर कारखाना व आदिवासी साखर कारखान्याचा हंगाम संपला असून येत्या आठवडय़ात खाजगी तत्त्वावरील ऑस्टोरिया शुगर कारखान्याचा गाळप हंगामदेखील संपणार आहे. यंदा अवघा 90 ते 100 दिवसच साखर हंगाम राहिल्याने ऊसतोड मजुरांसह त्यावर आधारित मजुरांना किमान नऊ महिने आता दुसरे काम शोधावे लागणार आहे.यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून साखर हंगामाला सुरुवात झाली होती. ऊस कमी असल्यामुळे अनेक कारखान्यांनी जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी आटोकाट प्रय} केले. परंतु अपेक्षित गाळप कुठलाच कारखाना करू शकला नाही. तिन्ही कारखाने झाले होते सुरूयंदा जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप केले. गाळप क्षमतेबाबत सातपुडा साखर कारखाना सर्वाधिक अर्थात पाच हजार मेट्रिक टन दैनंदिन ऊस गाळप क्षमतेचा आहे. त्या खालोखाल खासगी तत्त्वावरील अॅस्ट्रोरिया शुगर हा कारखाना असून तेथे दैनंदिन अडीच हजार मे.टन ऊस गाळप होतो तर नवापूरचा आदिवासी साखर कारखाना साडेबाराशे मे.टन दैनंदिन गाळप क्षमतेचा आहे. यंदा तिन्ही साखर कारखान्यांनी वेळेवर गाळप सुरू केले होते.ऊस पळवापळवीगेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे दोन वर्षात ऊस लागवड घटली होती. त्याचा परिणाम साहजिकच ऊस टंचाईवर यंदाच्या गाळप हंगामात झाला. तिन्ही साखर कारखान्यांना ऊस टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. नाशिक, नगर तसेच गुजरातमधील काही साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस मिळविण्यासाठी यंदा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी काही कारखान्यांनी गावोगावी प्रतिनिधी पाठवून शेतक:यांचा ऊस मिळविण्यासाठी प्रय} केला तर काहींनी तालुकास्तरावर गट कार्यालयेदेखील सुरू केली होती. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उसापैकी 20 ते 25 टक्के ऊस जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनी यंदा पळविल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळपावर झाला   आहे.मजूर, कामगारांचे होणार हालयंदा अवघ्या अडीच ते तीन महिन्यातच साखर हंगाम आटोपल्याने कामगार, ऊसतोड मजूर आणि कारखान्यांवर आधारित इतर घटकांची मोठी हाल होणार आहे. तब्बल नऊ ते दहा महिने त्यांना वेगळा रोजगार शोधावा लागणार आहे. उसाची पुरेशी उपलब्धता असल्यास साखर हंगाम साधारणत: मार्च महिन्याच्या मध्यार्पयत किंवा अखेर्पयत चालतो. त्यानंतर जुलैपासून कामगारांना पुढील गाळप हंगामाच्या तयारीसाठी कारखान्यांमध्ये कामावर घेतले जाते. परिणामी चार ते पाच महिनेच कामगारांना दुसरा रोजगार शोधावा लागतो. यंदा मात्र तो कालावधी मोठा राहणार आहे.  पुढील वर्षी जादा ऊसयंदा पजर्न्यमान चांगले असल्यामुळे आणि भूगर्भातील पाणी पातळीदेखील समाधानकारक असल्यामुळे यंदा ऊस लागवडीचे प्रमाण ब:यापैकी आहे. त्यामुळे पुढील साखर हंगामासाठी तिन्ही साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिन्ही साखर कारखान्यांनी नियोजनदेखील केले आहे.आस्टोरिया शुगर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक गाळप खाजगी तत्त्वावरील अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याने केले आहे. हा कारखाना 2फेब्रुवारीर्पयत एकूण 84 दिवस चालला असून तीन लाख सहा हजार 380 मे.टन ऊस गाळप करून दोन लाख 86 हजार 810 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 9.41 टक्के राहिला.सातपुडा कारखानासातपुडा साखर कारखान्याने 2 फेब्रुवारीर्पयत एकुण 84 दिवस ऊस गाळप केला. एकूण दोन लाख 61 हजार 120 मे.टन ऊस गाळप करून दोन लाख 36 हजार 425 क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा 9.16 राहिला आहे. कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मे.टन आहे.आदिवासी कारखानाआदिवासी साखर कारखान्याने यंदा 67 दिवस गाळप केले. त्यांनी 85 हजार 503 मे.टन ऊस गाळप करून 77 हजार 830 क्विंटल साखर उत्पादित केली. सरासरी साखर उतारा 9.10 इतका राहिला.आदिवासी साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा समारोप यंदा जानेवारी महिन्यातच झाला. 21 जानेवारी रोजी कारखाना बंद झाला. कारखान्याची गाळप क्षमता साडेबाराशे मे.टन आहे.4सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी संपला असून आदिवासी साखर कारखान्याचा हंगाम गेल्याच महिन्यात संपला. पुढील आठवडय़ात अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याचादेखील गळीत हंगामाचा समारोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कारखान्यांचा साखर हंगाम 90 ते 100 दिवसांच्या दरम्यानच राहिला आहे. गेल्यावर्षी 120 ते 130 दिवसांच्या दरम्यान साखर हंगाम होता.तिन्ही साखर कारखान्यांच्या परिसरात यंदा ऊसतोड मजुरांच्या     पाल्यांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे   विद्याथ्र्याची शिक्षणाची ब:यापैकी सोय झाली होती. आता या विद्याथ्र्याना पुन्हा आपल्या गावाच्या शाळेत दाखल करावे लागणार असल्यामुळे या विद्याथ्र्याच्या शिक्षणाची एकप्रकारे परवडच होणार असल्याचे स्पष्ट     आहे.