शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

तळोद्यात कार्य समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. ...

तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याउलट आघाडीतील मंत्री ओबीसींची परिषद घेऊन दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपाच्या नंदुरबार जिल्हा प्रभारी खासदार रक्षा खडसे यांनी केली. तळोदा येथील आदिवासी विकास भवनात बुधवारी कार्य समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, नागेश पाडवी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होते.

राज्यातील आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच आता ओबीसी समाजाचेही आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे दोन्ही आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी पक्षाने येत्या २६ जून रोजी तीव्र आंदोलन छेडले आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर झटकून मोकले होत आहे. साहजिकच यामुळे समाजाचीही दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रवी अनासपुरे, खासदार डॉ. हीना गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कल्पना पांड्या, सुनील चव्हाण, कपिल चौधरी, डॉ. स्वप्नील बैसाने, दारासिंग वसावे, प्रवीण गिरासे, राजेंद्र गावीत, नीलाबेन मेहता, भारती कलाल, कैलास चौधरी, प्रकाश वळवी, नारायण ठाकरे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रदीप शेंडे, जगदीश परदेशी, हेमलाल मगरे, भैय्या चौधरी, गोकुळ पवार यांनी परिश्रम घेतले.

व्यासपीठावर बसण्यावरून रुसवे, फुगवे

प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी संयोजकांनी व्यासपीठ तयार केले होते. या व्यासपीठावर बसण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण झाली होती. आपल्याला जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून दोन पदाधिकारी यांनी तावातावाने कार्यक्रम सोडून बाहेर पडले होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना समजूत काढताना संयोजकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. शेवटी एकाची समजूत काढून त्यास व्यासपीठावर बसवून शांत केले. तर दुसरा कार्यक्रम सोडून माघारी परतलाच नाही. मात्र पदाधिकाऱ्यांच्या अशा रूसव्या, फुगव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा होती.