शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुल्याधिष्ठीत समाज निर्मिती हेच वारकरी संप्रदायाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:13 IST

राज्यस्तरीय वारकरी संमेलन : अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांचे प्रतिपादन

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऋुषी मुनींच्या काळापासून चालत आलेले विचारांचे अधिष्ठान व संतांची परंपरा ही केवळ भक्ती मार्गानेच नव्हे तर समाजाच्या सर्वागीन विकासाचा दृष्टीकोण समोर ठेवून मुल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रय} करणे हेच खरे वारकरी संप्रदायाचे कार्य आहे. संतांचे विचार हे कुणाही एका जाती धर्मासाठी नाही. ते पूर्वापारपासून पुरोगामीच असल्याचा दावाही अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.नंदुरबार येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय वारकरी संमेलन व किर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या संमेलनासाठी अखिल भारतीय वारकरी संप्रदयाचे अध्यक्ष बोधले महाराज उपस्थित आहेत. संमेलन व वारकरी संप्रदायाचा एकुणच भुमिकेबाबत ‘लोकमत’शी बोलतांना त्यांनी सांगितले, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावागावात ते रुजले आहे. संतांचे विचार समाजार्पयत पोहचविण्यासाठी किर्तन हे सर्वात चांगले माध्यम आहे. किर्तनातून केवळ धार्मिक विचार मांडले जात नाही. तर त्यात आता सामाजिक मुल्यांची रुजवन केली जाते. पर्यावरण, कुपोषण, बेटीबचाव, जलसंधारण, स्वच्छता यासारखे विविध विषय देखील किर्तनाच्या माध्यमातून जनमानसात पोहचवले जात आहेत. शासनाचा देखील हे आता ध्यानी आल्याने वारकरी संप्रदायाला शासनाचेही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे गावागावात विखुरलेला वारकरी संप्रदायाला संगठीत करण्यासाठी 2003 मध्ये आपण प्रयत्न केला आणि त्यातूनच अखिल भारतीय वारकरी संप्रदायाची बांधणी झाली. या संघटनेला समाजातून कसा पाठबळ मिळतो ते अनुभवण्यासाठी तुकाराम महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्ताने देहू येथे पहिले वारकरी संप्रदायाचे संमेलन भरवले. विशेष म्हणजे या संमेलनात एक लाख, चार हजार चारशे वारकरी पारायणाला बसले होते. व इतर तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती होती. वारक:यांचा हा प्रतिसाद आनंद देणारा होता. त्यातूनच संमेलनाची परंपरा कायम सुरू केली. पुढे आळंदी येथे हे संमेलन झाले. तेथेही लाखाच्या संख्येत वारक:यांची उपस्थिती होती. गेल्यावर्षी दिल्लीला हे संमेलन घेतले. या ठिकाणी फारसे नियोजन नसतांनाही महाराष्ट्रीयन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या वर्षी नंदुबार येथे मुद्दामहून हे संमेलन घेतले आहे. कारण संतांची शिकवण आहे उपेक्षीत घटक जेथे जास्त तेथे काम करावे. या भागात संत विचार पोहचले असले तरी ते व्यापक स्तरावर पोहचावे व विशेषत: त्या माध्यमातून सामाजिक मुल्यांची जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. या भागात कुपोषणासारखा गंभीर प्रश्न आहे. पण कुपोषण केवळ जेवन न मिळाल्यानेच होते असे नाही, त्याला अनेक कारणे आहेत. त्याचेही प्रबोधन आवश्यक आहे. केवळ मानसांचेच नव्हे तर जमिनीचेही कुपोषण होत आहे. या जमिनीला सुपीक करण्यासाठी काय केले पाहिजे त्याचेही प्रबोधन होणार आहे. सात दिवस विविध विषय घेवून हे संमेलन चालेल. या संमेलनात महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदाय सहभागी होणार  आहे.