शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उंटावद ते मलोणी पुलाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे प्रशासनासह ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले असल्याने लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुलाच्या अंतीम टप्प्यातील काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहादा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील उंटावद ते मलोणीकडे जाणाºया मार्गावरील गोमाई नदीवर हा पूल उभारण्यात आला असून, या पुलाच्या अंतिम टप्प्यातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा आधार घेत संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्याची चर्चा आहे. अंतीम टप्प्यातील हे काम एका महिन्यात पूर्ण होणार होते मात्र या डबक्यामुळे ते चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून ठेकेदारास काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे डोळे असून, आंधळ्याचे सोंग करीत असल्याचा आरोप केला जात आहे.येत्या चार महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम झाले नाही तर पुन्हा एक वर्ष या पुलाच्या बांधकामासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देवून संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.ठेकेदारास दोंडाईचा येथे नवीन काम मिळाले असल्याने तो या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. हा ठेकेदार नवीन कामामुळे जुन्या कामाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करून संबंधित पुलाचे काम येत्या महिनाभरातच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे