शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

उंटावद ते मलोणी पुलाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे प्रशासनासह ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले असल्याने लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुलाच्या अंतीम टप्प्यातील काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहादा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील उंटावद ते मलोणीकडे जाणाºया मार्गावरील गोमाई नदीवर हा पूल उभारण्यात आला असून, या पुलाच्या अंतिम टप्प्यातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा आधार घेत संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्याची चर्चा आहे. अंतीम टप्प्यातील हे काम एका महिन्यात पूर्ण होणार होते मात्र या डबक्यामुळे ते चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून ठेकेदारास काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे डोळे असून, आंधळ्याचे सोंग करीत असल्याचा आरोप केला जात आहे.येत्या चार महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम झाले नाही तर पुन्हा एक वर्ष या पुलाच्या बांधकामासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देवून संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.ठेकेदारास दोंडाईचा येथे नवीन काम मिळाले असल्याने तो या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. हा ठेकेदार नवीन कामामुळे जुन्या कामाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करून संबंधित पुलाचे काम येत्या महिनाभरातच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे