शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

शहादा-मंदाणे राज्यमहामार्गाचे काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, ...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, बोरद, तऱ्हाडी, परिवर्धा, शहादा, मंदाणे, शहाणे, मालकातर, बोराडी सांगवी व पुढे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पुढे हातेड ते अमळनेर, पारोळा, भडगाव असा मोठ्या लांबीचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा राज्यमार्गाचा दर्जा ठरलेल्या या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. केंद्र सरकारकडे खासदार डॉ.हीना गावीत यांनी पाठपुरावा करून एनईटी अंतर्गत या महामार्गाचे काम मंजूर करून घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचे नियंत्रण असून शहादा बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कलमाडी ते वेळावदपासून शहादा, मंदाणे, शहाणा, मालकातरपर्यंत सुमारे ५५ किलोमीटर रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर पूल व पाईपमोऱ्या नव्याने करण्यात येत आहेत. तसेच या मार्गावरील गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला भुयारी गटारी करण्याचे काम सुरू आहे. डोंगरगाव व पिंपर्डे याठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. हा मार्ग मध्य प्रदेश राज्याला जोडणारा असून सारंगखेडाकडून व नंदुरबार, शहादाकडून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीचा तसेच वेळ व इंधन वाचवणारा ठरणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वाहतूक वाढणार

हा राज्य मार्ग शहादा-मंदाणे व पुढे वडगाव-बोराडीकडे जात असला तरी मंदाणेमार्गे जावदा-भामरटानाकाकडे जाणारी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंदाणे-जावदा रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे आवश्यक आहे. गुजरात राज्याकडून तसेच दोंडाईचा, नंदुरबार, साक्रीकडून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी हाच मार्ग सोयीचे ठरणार असल्याने आतापासूनच वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

विकासाला हातभार

शहादा-मंदाणे महामार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना वाढत्या वाहतुकीमुळे चांगला फायद्याचा ठरणार आहे. उपहारगृह, चहाची दुकाने, वाहन गॅरेज अन्य दुकाने थाटण्याचे नियोजन बेरोजगार तरुण करीत असल्याने मंदाणे भागातील विकासला चालना मिळणार आहे.

मंदाणे येथे पुलाचे नव्याने काम व्हावे

मंदाणे येथील नदीवरील मोठ्या पुलाच्या कामास तब्बल २५ वर्षे झाली असून या पुलावरील दोन्ही बाजूकडील लोखंडी सळ्या निघून गेल्या पूल कमकुवत बनत चालला आहे. आजूबाजूचे संरक्षक कठडे निघत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक वाढल्यास हा पूल जास्त काळ टिकेल असे वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. सध्या महामार्गाचे काम सुरू असून याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.