शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

नंदुरबारात दीड लाख कुटुबांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:52 IST

‘नरेगा’ : तीन वर्षाची आकडेवारी, वर्षात मजुरीपोटी 110 कोटींची रक्कम अदा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गेल्या तीन वर्षात 1 लाख 47 हजार 371 कुटुंबियांच्या हाताला  काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे या कुटुंबियांसाठी 110 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम मजुरीपोटी अदा करण्यात आली आह़े एकीकडे अकुशल निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र कुशल निधीसाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आह़ेया योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असतो़ पूर्वी या कामासाठी प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी दिली जात होती़ परंतु आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आह़े दरम्यान, नरेगाअंतर्गत 2015-2016 मध्ये 4 हजार 610, 2016-2017 मध्ये 4 हजार 548 तर 2017 च्या नोव्हेंबर्पयत एकाच वर्षी तब्बल 9 हजार 950 अशी एकूण 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़दीड लाख कुटुंबियांच्याहाताला कामयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े 2015-2016 वर्षात 47 हजार  823, 2016-2017 वर्षात 55 हजार 87 तर नोव्हेंबर 2017 र्पयत 44 हजार 461 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे वरील वर्षात अनुक्रमे 37 कोटी 72 लाख, 46 कोटी 57 लाख व 26 कोटी 37 लाख असा एकूण 110 कोटी 66 लाख रुपयांचा अकुशल निधी मजुरीपोटी वाटप करण्यात आला आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मजुरांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आह़े त्यामुळे अशांना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन    करुन त्याना रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली जात़े त्याच प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करुन अकुशल निधीचे मजुरीपोटी वाटप करण्यात येत असत़े ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मजुरांचे मार्गदर्शनाअभावी स्थलांतर होत असत़े मजुरांचे गुजरात, मध्यप्रदेशात रोजगारासाठी होणा:या स्थलांतरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आव्हाण जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आह़े जिल्ह्यात मजुरीचा प्रश्न गेल्या काही वर्षात वाढत आह़े कुटुंबियांना आपला घराचा गाडा ओढतांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत असत़े परंतु गेल्या जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याने नरेगांतर्गत हाताला काम मिळू लागले असल्याने  स्थानिक मजुरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े मागेल त्याला  काम या तत्वावर मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका                    पार पाडत असल्याचे दिसून येत            आह़े गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़ त्यात विविध रस्ते, सिंचन विहिरी, शौचालये आदींचे कामे पूर्णत्वास येत असतात़ नरेगासाठी केंद्र व राज्य असे दोन्ही सरकारांकडून ठरविक दिवसांच्या रोजगारापोटी असलेल्या निधीची तरतुद करण्यात आले आह़े परंतु काही प्रमाणात केंद्राकडून निधी येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़