शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

नंदुरबारात दीड लाख कुटुबांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:52 IST

‘नरेगा’ : तीन वर्षाची आकडेवारी, वर्षात मजुरीपोटी 110 कोटींची रक्कम अदा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गेल्या तीन वर्षात 1 लाख 47 हजार 371 कुटुंबियांच्या हाताला  काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे या कुटुंबियांसाठी 110 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम मजुरीपोटी अदा करण्यात आली आह़े एकीकडे अकुशल निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र कुशल निधीसाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आह़ेया योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असतो़ पूर्वी या कामासाठी प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी दिली जात होती़ परंतु आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आह़े दरम्यान, नरेगाअंतर्गत 2015-2016 मध्ये 4 हजार 610, 2016-2017 मध्ये 4 हजार 548 तर 2017 च्या नोव्हेंबर्पयत एकाच वर्षी तब्बल 9 हजार 950 अशी एकूण 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़दीड लाख कुटुंबियांच्याहाताला कामयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े 2015-2016 वर्षात 47 हजार  823, 2016-2017 वर्षात 55 हजार 87 तर नोव्हेंबर 2017 र्पयत 44 हजार 461 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे वरील वर्षात अनुक्रमे 37 कोटी 72 लाख, 46 कोटी 57 लाख व 26 कोटी 37 लाख असा एकूण 110 कोटी 66 लाख रुपयांचा अकुशल निधी मजुरीपोटी वाटप करण्यात आला आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मजुरांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आह़े त्यामुळे अशांना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन    करुन त्याना रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली जात़े त्याच प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करुन अकुशल निधीचे मजुरीपोटी वाटप करण्यात येत असत़े ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मजुरांचे मार्गदर्शनाअभावी स्थलांतर होत असत़े मजुरांचे गुजरात, मध्यप्रदेशात रोजगारासाठी होणा:या स्थलांतरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आव्हाण जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आह़े जिल्ह्यात मजुरीचा प्रश्न गेल्या काही वर्षात वाढत आह़े कुटुंबियांना आपला घराचा गाडा ओढतांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत असत़े परंतु गेल्या जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याने नरेगांतर्गत हाताला काम मिळू लागले असल्याने  स्थानिक मजुरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े मागेल त्याला  काम या तत्वावर मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका                    पार पाडत असल्याचे दिसून येत            आह़े गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़ त्यात विविध रस्ते, सिंचन विहिरी, शौचालये आदींचे कामे पूर्णत्वास येत असतात़ नरेगासाठी केंद्र व राज्य असे दोन्ही सरकारांकडून ठरविक दिवसांच्या रोजगारापोटी असलेल्या निधीची तरतुद करण्यात आले आह़े परंतु काही प्रमाणात केंद्राकडून निधी येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़