भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी म्हण ‘शासनकारण’ सुरू झाल्यानंतर प्रचलित झाली़ मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या म्हणीला पूर्णपणे छेद देत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आह़े यामुळे कागद ते कागद असा प्रवास करणा:या सामान्यांच्या ‘समस्या’ वेगाने सोडवण्याचा प्रयत्न होत आह़े राज्यात ई-गव्र्हनन्स राबवून कागदाचा कमीत कमी वापर आणि वेगात काम करण्यासाठी प्रयत्न सुरू होत़े यातून 2014 मध्ये यासाठी नॅशनल ईन्फरेमेशन सेंटरने ई-ऑफिस ही प्रणाली राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता़ हा प्रयत्न आजघडीस नंदुरबार जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी ठरला असून ई-ऑफिसद्वारे वर्षाला आठ हजार फाईंलींवर यशस्वीपणे कामकाज करून त्यांचा निपटारा होत आह़े नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 22 विभाग या ई-ऑफिस प्रणालीसोबत जोडले असून एकदा तयार केलेली फाईल ही प्रत्येक विभागाला अवलोकन करून पाठवून शेवटी त्यावर निर्णय होतो आह़े अत्यंत सोप्या पद्धतीने होणा:या या कामकाजामुळे सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणा:या योजना अधिक गतीमान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाकडून येत्या 2018 मध्ये सर्व सहा तहसील कार्यालय आणि दोन प्रांताधिकारी कार्यालय येथेही ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येत आह़े विशेष म्हणजे सर्वच अधिकारी ई-ऑफिस प्रणालीद्वारे घरी बसून शासकीय कामकाज पूर्ण करू शकत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
एका वर्षात आठ हजार फायलींवर कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:06 IST
टेक्नीसेव्ही प्रशासन : नंदुरबार जिल्हा ई-ऑफिस वापरात राज्यात तिसरा
एका वर्षात आठ हजार फायलींवर कामकाज
ठळक मुद्देवर्षभरात 28 हजार वेळा अवलोकन राज्यात कोकण विभागात सिंधूदुर्ग, औरंगाबाद विभागातून जालना आणि नाशिक विभागातून नंदुरबार अशा तीन ठिकाणी 2014 पासून ई-ऑफिसद्वारे कामकाज केले जात़े एका विभागातून दुस:या विभागात देण्यात येणा:या कागदपत्रांचे एकदाच स्कॅनिंग करून ते