लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वेस्थानक ते वन विभाग कार्यालयाच्या दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेचा ३५ हजार रुपयांचा ऐवज दोन महिलांनी लंपास केल्याची घटना नंदुरबारात घडली. दहा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उधना येथे राहणाºया सुरेखा गुलाब भदाणे या नंदुरबार रेल्वे स्थानकातून पातोंडा येथे जाण्यासाठी रिक्षात बसल्या. त्यांच्यासोबत इतरही दोन महिला होत्या. दोन्ही महिला व रिक्षा चालकाने महिलांनी नकळत महिलेच्या बॅगमधून ३५ हजार २९० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास केले. घटनेनंतर महिला गावी निघून गेली होती. दहा दिवसांनी परत आल्यावर नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.दरम्यान, पोलिसांकडून संबधीत रिक्षा आणि त्यातील दोन महिला यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही रिक्षा पोलीस ठाणे आवारातूनच गेली असतांना ही घटना घडली.
रिक्षा प्रवासात महिलेचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:49 IST