मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कुटूंब एकत्र आले, कुटूंबातील व्यक्तींमधील जिव्हाळा वाढल्याचे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे पती-प}ींमधील दुरावा व भांडणे देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनपासून म्हणजेच 23 मार्चपासून 10 एप्रिलर्पयत अर्थात 19 दिवसात पोलीस विभागाच्या महिला सेलकडे 11 महिलांनी तक्रारी अर्ज केले आहेत. कुटूंबात किंवा पतीकडून त्रास असल्याचे हे अर्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे कुणाला समेटसाठी अद्याप बोलविले गेले नसल्याचेही समोर आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर झालेले लॉकडाऊन आणि लागू केलेली संचारबंदी यामुळे राजापासून रंकार्पयत सर्वच घरातच थांबले आहेत. कामधंदे बंद आहेत. नोकरदारांना वर्क फ्रॉम होम दिले गेले आहे. घरातच राहून कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकजण कुटूंबासमवेत वेळ घालवू लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर ‘कुटूंबवत्सल’चा ट्रेण्ड असलेले फोटो मोठय़ा प्रमाणावर शेअर होऊ लागले. ते पाहून कुटूंबांमधील व्यक्तींमध्ये प्रेम आणि जिव्हाळा अधीकच वृंदीगत झाल्याचे चित्र असतांना दुसरीकडे मात्र याच काळात महिलांवरील कौटूंबिक अत्याचारांचे प्रमाण कायम राहिल्याचेही समोर येत आहे. तक्रारींची सरासरी कायम लॉकडाऊनमुळे घराघरात कुटूंब एकत्र वेळ घालविण्यात रंगलेले असतांना दुसरीकडे सासूकडून सुनेला त्रास, पतीकडून प}ीला त्रास, कुठे चारित्र्याचा संशय तर कुठे पैशांसाठी महिलेला मारहाण असे प्रकार देखील घडत आहेत. पोलीस दलाच्या महिला सेलकडे गेल्या 19 दिवसात 11 तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या आहेत. या सेलकडे महिन्याला सरासरी 25 तक्रारी अर्ज येतात. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थिती असतांना महिन्याला जेवढय़ा तक्रारी येतात तेवढय़ाच सरासरी तक्रारी लॉकडाऊनच्या काळात देखील आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील घरगुती हिंसाचाराला महिला बळी पडत असल्याचे चित्र आहे. समुपदेशन थांबलेमहिला सेलकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सेलकडून तक्रारदार महिला व आरोप असलेल्या लोकांना बोलविले जाते. त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. यासाठी महिला पोलीस आणि त्यांच्यातील समुपदेशक तक्रारदार आणि त्रास देणारे यांना सर्वच बाजूने समजविण्याचा प्रय}ात असतात. त्यातून अनेकांचे संसार देखील वाचल्याचे अनेक उदाहरणे आहेत. गुन्हा दाखल होऊ नये, संसार तुटू नये ही तळमळ या सेलमधील महिला कर्मचा:यांची असते. परंतु जर दोन्हीकडील मंडळी ऐकण्याच्या तयारीत नसतील तर मात्र गुन्हा दाखल करण्यास त्यांना मोकळीक दिली जाते. लॉकडाऊन तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे सध्या कुणालाही समुपदेशनासाठी बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व 11 अर्जावर आता लॉकडाऊन उठल्यानंतरच समुपदेशन बाबतचा निर्णय होणार आहे. समाजाची मानसिकता कधी बदलणार.. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. आता जग बदलत असले तरी मानसिकता बदलण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरदार, व्यावसायिक पुरुषांना सुट्टी आहे. परंतु घरातील महिलांचे काम मात्र कमी झाले नाही. या काळात महिलांवरील कामाचा ताण अधीकच वाढल्याचेही एका सव्र्हेक्षणात पुढे आले आहे. त्यातच कुटूंबाअंतर्गत होणारे मानसिक आणि शाररिक अत्याचार कायम आहेत. महिला सेलकडे आलेला आकडा हा प्रातिनिधीक स्वरूपाचा आहे. अनेकजण अत्याचार सहन करून गप्प राहत असतीलही..ते चित्र मात्र पुढे येत नाही.
स्त्री जन्मा तुझी कहाणी लॉकडाऊनमध्येही नयनी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:32 IST