शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:32 IST

चहावाल्याने कडक सरकार दिल्याचा दावा

नंदुरबार : मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. मात्र जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणावर व जमिनीवर कुणीही हात लावू शकणार नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी नंदुरबार येथे झालेल्या सभेत दिला.नंदुरबार व धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉ.हीना गावीत आणि डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी येथील धुळे रस्त्यावरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजपने गेल्या पाच वर्षात अनेक विकास योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या.काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमाफी दिली गेली पण ज्यांच्यासाठी ती दिली गेली त्या आदिवासींपर्यंत ती पोहोचली नाही. केवळ धनधांडग्यांसाठीच ती योजना होती. कारण आदिवासींचे बँकेत खातेच नव्हते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळाले नव्हते. पण भाजप सरकार सत्तेवर येताच आदिवासींचे खाते उघडवले आणि थेट लाभ त्यांच्या खात्यात पोहोचवला.‘आधार’ची योजना काँग्रेसने नंदुरबारपासून सुरू केली आणि ती योजना बंद व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनीच दावा दाखल केला. लोकांची फसवेगिरी करण्याचे काम काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते करीत होते असा आरोप त्यांनी केला.देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली पाच एकरची अट काढून ती सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नंदुरबारच्या चहाचा संदर्भ देत एक चहावाल्यानेही गेल्या पाच वर्षात कडक सरकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.आदिवासींच्या वनउपजाला योग्य भाव देऊन आदिवासी शेतकºयांना समृद्ध करण्याचा, कुपोषण, सिकलसेल व आरोग्याबाबत व्यापक योजना राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात राहणार असल्याचे सांगून भाजपचे सरकार आल्यास यापुढे आदिवासी शेतकºयांना बांबूच्या शेतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय तसेच या शेतकºयांसाठी पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील धोरणात्मक निर्णयावर आरोप करीत त्यांनी जनतेची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण