शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:32 IST

चहावाल्याने कडक सरकार दिल्याचा दावा

नंदुरबार : मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. मात्र जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणावर व जमिनीवर कुणीही हात लावू शकणार नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी नंदुरबार येथे झालेल्या सभेत दिला.नंदुरबार व धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉ.हीना गावीत आणि डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी येथील धुळे रस्त्यावरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजपने गेल्या पाच वर्षात अनेक विकास योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या.काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमाफी दिली गेली पण ज्यांच्यासाठी ती दिली गेली त्या आदिवासींपर्यंत ती पोहोचली नाही. केवळ धनधांडग्यांसाठीच ती योजना होती. कारण आदिवासींचे बँकेत खातेच नव्हते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळाले नव्हते. पण भाजप सरकार सत्तेवर येताच आदिवासींचे खाते उघडवले आणि थेट लाभ त्यांच्या खात्यात पोहोचवला.‘आधार’ची योजना काँग्रेसने नंदुरबारपासून सुरू केली आणि ती योजना बंद व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनीच दावा दाखल केला. लोकांची फसवेगिरी करण्याचे काम काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते करीत होते असा आरोप त्यांनी केला.देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली पाच एकरची अट काढून ती सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नंदुरबारच्या चहाचा संदर्भ देत एक चहावाल्यानेही गेल्या पाच वर्षात कडक सरकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.आदिवासींच्या वनउपजाला योग्य भाव देऊन आदिवासी शेतकºयांना समृद्ध करण्याचा, कुपोषण, सिकलसेल व आरोग्याबाबत व्यापक योजना राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात राहणार असल्याचे सांगून भाजपचे सरकार आल्यास यापुढे आदिवासी शेतकºयांना बांबूच्या शेतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय तसेच या शेतकºयांसाठी पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील धोरणात्मक निर्णयावर आरोप करीत त्यांनी जनतेची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण