शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आघाडी व युतीचा धर्म पाळला जाईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:35 IST

गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस व भाजप दक्ष

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात आमदारकी भाजप अर्थात गावीत गटाकडे तर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था या रघुवंशी अर्थात काँग्रेस गटाकडे अशी राजकीय स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. लोकसभेसाठी राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेची झालेली युती आता दुभंगली आहे. भाजप-सेना एकत्र आली असली तरी मने जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे राष्टÑवादी खुल्या दिलाने काँग्रेसला कशी आणि कोणती मदत करते याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे.नंदुरबार तालुका नवापूर आणि नंदुरबार अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यातील सहा महसूल मंडळांपैकी दोन महसूल मंडळे हे नवापूर मतदारसंघात येत असल्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे नेहमीच दोलायमान असतात. सद्य स्थितीचा विचार करता नगरपालिका व पंचायत समिती काँग्रेसकडे आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युती चर्चेची ठरली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने देखील या युतीने तयारी चालविली होती. परंतु लोकसभेला भाजप-सेना युती झाल्यामुळे आता सेनेला पक्ष आदेशामुळे काँग्रेसची साथ सोडावी लागणार असून भाजपच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरणार आहे.मने जुळतील का?काँग्रेस व भाजपकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. घटक पक्षांना एकत्र करणे, चर्चा करणे, विविध माध्यमातून एकत्र येणे असे प्रकार काँग्रेस, भाजपमध्ये सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजप-सेनेची युती झाली आहे. दोन्ही पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. भाजप-सेनेने संयुक्त मेळावा व पत्रकार परिषद घेवून ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...’ या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात देखील केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये पाच वर्ष विस्तवही जात नव्हता. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसच्या साथीने चार नगरसेवक सेनेचे निवडून आले होते. आता एकदिलाने काम करण्याची घोषणा केली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली जातील का? हा प्रश्न कायम राहणार आहे.राष्टÑवादीची साथदुसरीकडे काँग्रेस व राष्टÑवादी यांची आघाडी देखील एकदिलाने काम करणार असे म्हणत आहे. गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपकडे होते. अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना मानणारा वर्ग या पक्षात असल्यामुळे ते चित्र यंदाही कायम राहते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे.काँग्रेसचा कार्यकर्त्यांवर भरकाँग्रेसकडे असलेली नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ या संस्थांच्या बळावर काँग्रेस तालुक्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रचारात सक्रीय राहणार नसल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.एकुणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही एक प्रकारे रंगीत तालीमच राहणार आहे. यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवणे व त्यांना उत्साहित करण्यासाठी आघाडी व युतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत.