शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

आठवड्यात तापमान चाळीशी गाठणार

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: March 17, 2019 11:59 IST

‘आयएमडी’चा इशारा : शुष्क व उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार, नंदुरबारचा पारा ३७ अंशावर

संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पूर्वेकडून येत असलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात येत्या आठवड्यात तापमान चाळीशीपार जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ तसेच ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे़पुढील काही दिवसात होणाºया तापमान वाढीची चाहूल नंदुरबारकरांना शनिवारी लागली़ नंदुरबारात तब्बल ३७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़ तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान अनुक्रमे ३६.३ व ३७.६ इतके नोंदविण्यात आले़उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्याने पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत आहेत़ त्याच प्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये शुष्क वाऱ्यांचा प्रभाव जाणवनार असल्याचे ‘आयएमडी’कडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे साहजिकच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़सध्या हिमालयाच्या पायथ्याशी ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ तर मध्य प्रदेशच्या मध्य भागाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे़ त्यामुळे पुर्वेकडून उष्ण वाºयांचा प्रभाव राज्यभरात वाढताना दिसून येत आहे़ यामुळे संभाव्य तापमान वाढ होणार आहे़दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झालेली आहे़ तर काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झालेली बघायला मिळाली़ विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचीत वाढ झालेली आहे़ राज्यात उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे़दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे़ तर खान्देशसह उत्तर महाराष्ट्र तापमान कोरडे व उष्ण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ दरम्यान, १७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’ पुणेतर्फे देण्यात आला आहे़दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळापुर्वीची स्थिती निर्माण झालेली आहे़ तसेच बाष्पीभवन होऊन पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, हा कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या उत्तरेकडे निर्माण झाला आहे़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे़तापमानात वाढ होणार असल्याचे याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे़ नंदुरबारात दुपारच्या वेळी मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बºयापैकी शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे़नंदुरबारात सध्या ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ वाºयाचा बºयापैकी प्रभाव जाणवत असल्याने साहजिकच धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़ नंदुरबारात शनिवारी कमाल ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे़ तर १ हजार ५ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झालेला होता़ आद्रता साधारणत २९ टक्के इतकी होती़ आद्रतेत हळुहळु वाढ होणार असल्याने साहजिकच उकाड्यातही वाढ होणार असल्याची शक्यत व्यक्त करण्यात येत आहे़दरम्यान, पंजाब, हरियाना, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून कमी दाबाचा पट्टा जात असल्याने या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ जाणवणार आहे़ त्यामुळे येथील उष्ण लहरींमुळे महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे़ पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे़