शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

हमसे का भूल हूई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:32 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले असते, सदस्यांची बैठक कधी झाली, एकमताने कधी ठरविले गेले याबाबतचा खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त करीत सभापती अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना लेखी पत्र दिले. त्यामुळे विषय समिती बदलाबाबतची चर्चा रंगली आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या बदलाचा निर्णय शुक्रवारच्या सर्वसाधारणत बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेची सुरुवातीपासूनच अर्थ व बांधकाम समिती मिळावी यासाठीची मागणी होती. परंतु सत्ता स्थापनेच्या वेळी ऐनवेळी घडामोडी होऊन काँग्रेस-सेनेची युती झालेली असतांना त्यात भाजपचे नेते दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री दिपक पाटील यांनी एण्ट्री करीत सभापतीपद मिळविले. शिवाय शिवसेनेला दुय्यम दर्जाचे कृषी व पशुसंवर्धन या समित्या देण्यात आल्या. आणखी एक सभापतीपद किंवा बांधकाम व अर्थ समिती या दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नाराज होते. गेल्या पाच महिन्यात ही नाराजी लपून राहिली नाही.गेल्या वेळच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे काही सदस्य व शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहून तांत्रिकदृष्टया अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अध्यक्षांना अर्ध्यातून सभा सोडावी लागून ती स्थगित करण्यात आली होती. त्याचवेळी यापुढे आणखी घडामोडी घडतील हे स्पष्ट झाले होते. अखेर राजकीय घडामोडी घडून शिवसेनेकडे बांधकाम समिती देण्याचा निर्णय झाला. घडामोडी होतांना काँग्रेस, शिवसेना यांनी भाजपलाही विश्वासात घेतल्याचे आजच्या चित्रावरून स्पष्ट होते. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सभेपूर्वी दुपारी दिलेल्या स्रेहभोजनाला भाजपचेही सदस्य उपस्थित राहिले. शिवाय विषय समिती बदलाचा विषय निघाला त्यावेळी देखील काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्टÑवादीचे सदस्य देखील शांत होते. त्यामुळे हा विषय एकमताने मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे याचवेळी सभापती पाटील यांनी आपले म्हणने रेकॉर्डवर घेण्याची सुचना केली. शिवाय अध्यक्षांना लेखी पत्रही दिले. त्याची उत्तरे मिळावी अशी मागणी केली.अभिजीत पाटील यांची राजकीय पार्श्वभुमी वडिल शहाद्यात भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्याचे वलय पहाता त्यांना सभापतीपदही मिळाले आहे. परंतु विषय समिती बदलाच्या वेळी त्यांना विश्वासात न घेतले गेल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आजचा निर्णय एकमताने झाला असल्याचे बोलले जात असले तरी अभिजीत पाटील यांची खदखद कायम आहे. जिल्हा परिषदेत सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत. काँग्रेसला अध्यक्ष व दोन सभापती, शिवसेनेला उपाध्यक्षपद तर भाजपला एक सभापतीपद दिले गेले आहे. राष्टÑवादीचे तीन सदस्य भाजपाच्या गटात आहेत. त्यामुळे येथे विरोधीपक्षच कुणी नसल्याची स्थिती आहे.