शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निर्यात होत नसल्याने शेताततच वाया जातेय टरबूजचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची वाया गेली असून, हाता तोंडाशी आलेले पीक शेतातच पडून राहिल्याने लाखो रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकºयांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकवर आपल्या शेतातच मिळेल त्या भावाने विक्री करण्याची वेळ आली आहे.ब्राह्मणपुरीसह सुलतानपूर परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे टरबूज काही प्रमाणावर घेत असतात. त्याचबरोबर पीकदेखील आले. परंतु नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना विषाणुच्या व्हायरसमुळे संपूर्ण देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीला ही टरबूज कोणी घेण्यास तयार नाहीत.लाखो रूपयांचे उत्पन देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकºयाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणून शेतकºयांनी कुणी एक एकर कुणी दोन एकर तर कोणी चार एकर टरबूज पिकाची लागवड हजारो रूपये खर्च करून केली. यंदा उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, बाजारपेठ थंड झाली.शेतकरी बांधवांच्या शेतावर येऊन पीक घेऊन जाणारे व्यापारी मातीमोल किमतीने पीक घेऊ लागले आहे. आठ ते दहा रूपये किलोने घेणारे टरबूज पीक आता चार ते पाच रूपये किलो मागू लागले आहेत. शेतकरी बांधवांना टरबूज तोडायला लावून ते घेऊन न जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या हंगामात कोरोनाचा शेतºयांना जबर फटका बसला असल्याने लागवडीचा तरी खर्च निघायला पाहिजे या उद्देशाने मिळेल त्या भावाने शेतातच विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रशासनाकडून मालवाहतुकीचा परवाना मिळाला. परंतु व्यापारी माल नेण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे शेतकरी वेगळ्याच संकटात सापडला आहे. टरबूजपासून उत्पन्न नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काहींनी शेतातच उभ्या पिकांत रोटर फिरवला आहे.