शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

नंदुरबार तालुक्यात दोन लाख रोपांना वनविभाग देणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:49 IST

नंदुरबार : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 48 लाख रोप लागवडीचे लक्ष्य असताना 51 लाख वृक्ष रोवण्यात ...

नंदुरबार : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 48 लाख रोप लागवडीचे लक्ष्य असताना 51 लाख वृक्ष रोवण्यात आले होत़े अद्याप दुष्काळाची झळ पोहोचली नसल्याने सर्वच ठिकाणी रोपे सुस्थितीत आहेत़ यात नंदुरबार तालुक्यातील दोन लाख रोपांचा समावेश असून या रोपांचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग पाण्याचे नियोजन करत आह़े 1 जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुरूवात झाल्याच्या 25 दिवसात जिल्ह्यात 51 लाख खड्डे निर्मिती करण्यात येऊन 45 लाख 85 हजार 209 झाडांची लागवड करण्यात आली होती़ वनविभागाने तालुका आणि ग्रामीण स्तरावर पुरवठा केलेल्या या वृक्षांच्या संगोपनासाठी वनविभागानेच मोलाची भूमिका बजावल्याने नंदुरबार तालुक्यातील नागरिकांना दुष्काळातही दिलासा मिळाला आह़े तालुक्यातील अंबापूर, खोक्राळे, ठाणेपाडा, अंबापूर आणि वांजळा वनक्षेत्रात 130 हेक्टरवर लागवड केलेल्या 2 लाख 55 हजारपैकी 2 लाख 9 हजार झाडे सुरक्षित आहेत़ वनविभागाकडून झाडांची लागवड केल्यानंतर पाऊस आल्यानंतर चर पद्धतीने वृक्षांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत़े यंदाही समतल चरांची कामे करण्यात आली होती़ परंतू यंदा नंदुरबार तालुक्यात पावसाने पुरेशा प्रमाणात हजेरी न लावल्याने वनविभागाने प्रथमच झाडांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आह़े यांतर्गत सर्व पाच लागवड क्षेत्रात झाडांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत़ यात प्रामुख्याने वनविभागाकडून प्रत्येक झाडाजवळ खड्डा करुन निरुपयोगी ठरणा:या बाटल्यांद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न होणार आह़े यासाठी वनविभागाकडून कामकाज करण्यात येत आह़े तालुक्यात यंदा दुष्काळी स्थिती आह़े रोहयोच्या माध्यमातून हा उपक्रम करण्याचा विभागाचा प्रयत्न असून यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळून टाकाऊ बाटल्यांचा प्रश्न मार्गी लागणार आह़े या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी वनविभागाचे कर्मचारी घेणार असल्याचे सांगण्यात आले आह़े अंबापूर येथील 25 हेक्टरच्या मिश्र रोपवनात 62 हजार 500 पैकी 51 हजार 815, खोक्राळे येथील 30 हेक्टर मिश्र रोपवनात 75 हजार पैकी 68 हजार 250, ठाणेपाडा येथील 25 हेक्टरवरच्या साग रोपवनात 62 हजारपैकी 42 हजार 500, अंबापूर येथील 25 हेक्टरच्या मिश्र रोपवनात 27 हजार 500 पैकी 23 हजार 375 तर वांजळा येथील 25 हेक्टर वनक्षेत्रातील 27 हजार 500 झाडांपैकी 23 हजार 650 झाडे ही सुस्थितीत असल्याची माहिती देण्यात आली आह़े एकूण 82 टक्के रोपे जिवंत असल्याने वनविभागाकडून त्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत़ येत्या 10 दिवसानंतर तशी कारवाई सुरु होणार असल्याची माहिती आह़े प्रारंभी ठाणेपाडा येथील साग आणि खोक्राळे येथील मिश्र रोपवनात बॉटलद्वारे पाणी देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आह़े यासाठी पाणी वाहून नेणारे टँकर, पाण्याचा स्त्रोत आणि त्यासाठी लागणारा खर्च याची जुळवाजुळव विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती आह़े