शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

नंदुरबारला आंबेबारा मधून पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी आणून ते शहराला पुरविले जाणार आहे. धरणातील ५० टक्के पाणीसाठा आधीच आरक्षीत करण्यात आला आहे.नंदुरबार शहराला झराळी व आष्टे पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा केला जातो. झराळी येथील विरचक धरणात यंदा मुबकल पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा यंदा सामना करावा लागणार नाही हे स्पष्ट आहे. आंबेबारा धरणातील ५० टक्के पाणीसाठा देखील आरक्षीत केला जातो. यंदा आंबेबारा धरण देखील ओव्हरल्फो झाले होते. त्यामुळे पाणी पुरवठ्याची फारशी अडचण यंदा येणार नाही हे स्पष्टच आहे.आष्टे येथे शिवण नदीत नंदुरबार पालिकेने पाणी पुरवठ्यासाठी विहिर खोदली आहे. या विहिरीवरच पंपींग स्टेशन देखील आहे. जोपर्यंत या विहिरीला पाणी असते तोपर्यंत तेथून ३० टक्के भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु ही विहीर साधारणत: मार्च महिन्यात आटून जाते. यंदा देखील ही विहिर आटली आहे. त्यामुळे आता आंबेबारा धरणातील पाणी या विहिरीत टाकले जाणार आहे. धरणातील पाणी सोडण्याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. पालिकेचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.नदीत चारी खोदून हे पाणी आष्टे विहिरीत येणार आहे. साधारणत: दोन महिने हे पाणी चालू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विहिर अटल्याने झराळी पाणी पुरवठा योजनेवर लोड येत होता. त्यामुळे शहरातील जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. परिणामी अनेक वसाहतींमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. आता आंबेबाराचे पाणी आल्याने पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.नंदुरबार शहराला विरचक धरणातून ७० ते ७५ टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागातील पाणी पुरवठा हा आष्टे पंपींग स्टेशनमधून केला जातो. त्यासाठी आंबेबारा धरणाचा आधार घेतला जातो. साधारणत: तीन महिने येथून पाणी पुरवठा केला जात असतो.