लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या जलस्तरात वाढ होत असल्याने विरचक प्रकल्पाच्या जलसाठय़ात वाढ होणार आह़े या पाश्र्वभूमीवर पालिकेने घेतलेला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागे घेतला आह़े पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकानुसार 1 ऑगस्टपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला होता़ परंतू पावसामुळे विरचक प्रकल्पाच्या साठय़ात वाढ होत असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आह़े दरम्यान शहराला पाणीपुरवठा होणा:या विरचक प्रकल्पातील गाळ न काढला गेल्याने टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता़ हा आरोप पालिका पदाधिका:यांनी खोडून काढत गाळ काढण्याचा निर्णय हा शासनाकडून घेण्यात येतो़ धरण कोरडे झाल्यावरच गाळ काढणे शक्य होत़े परंतू विरचक प्रकल्पात मृतसाठा असल्याने गाळ काढण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी म्हटले आह़े
पालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:24 IST