शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी स्त्रोतच पाण्याखाली जिओ टॅगिंगसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक पाण्याचे स्त्रोत हे नदी, नाल्यांमध्ये तसेच धरणांच्या परिसरात आहेत. अशा ठिकाणी अद्यापही पाण्याचा प्रवाह किंवा पाणी साठलेले असल्यामुळे कर्मचा:यांना जीव धोक्यात घालून जिओ टॅगिंग करावे लागत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे मॅपींग करण्याची मोहिम सध्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीची मोहिम सध्या सुरू करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पहाता पाणी पुरवठा योजनांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे विहिरी, कुपनलिका आणि नाले व झ:यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील सर्वच पाणी स्त्रोतांची तपासणी करून त्यातील पाणी नमुने घेत त्यांचे रासायनिक पृथ:करण केले जात असते. त्यानुसार संबधीत पाण्याचे स्त्रोत हे पिण्यालायक आहे किंवा नाही हे ठरविले जाते. त्यासाठी मात्र प्रत्येक पाणी स्त्रोताची जियोफेनिसिनींग करणे आवश्यक असते. सध्या ते काम सुरू करण्यात आले आहे. त्याला गती देखील देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या कामात नंदुरबार जिल्हा राज्यात अग्रेसर होता. यंदा देखील जिल्हा अव्वल राहण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे.अनेक अडचणीजिल्ह्यातील दोन तालुके संपुर्णपणे डोंगराळ आणि द:याखो:यांचे आहेत. अशा ठिकाणच्या पाणी स्त्रोतांचे जिओ फिनिसिनिंग करण्याचे मोठे दिव्य सध्या कर्मचा:यांसमोर आहे. अनेक ठिकाणी कमरेएवढय़ा पाण्यातून जात पाणी स्त्रोत असलेल्या विहिरी आणि कुपनलिकांर्पयत पोहचावे लागत आहे. काही वेळा स्थानिकांची मदत घ्यावी लागत आहे तर काही वेळा स्वत: कर्मचा:यांनाच जीव धोक्यात घालत जावे लागत आहे. साडेआठ हजार स्त्रोतजिल्ह्यात 591 ग्रामपंचायतीअसून एकुण साडेआठ हजारापेक्षा अधीक पाणी स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणाहून किंवा स्त्रोताहून गाव, पाडय़ातील नागरिक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात ते अधिकृत स्त्रोत मानले जाते. त्यामुळे अशा स्त्रोतांची गाव, पाडे आणि द:याखो:यात जावून निश्चिती करण्यात आली. त्यांची एकुण संख्या 8,644 इतकी आहे. या सर्व स्त्रोतांचे अक्षांश, रेखांश निश्चिती करून त्याचे डिजीटलायङोशन करण्यात येत आहे. अॅप व वेबसाईटद्वारे ते सहज पहाता येत असते. हंगामी, बारमाही व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांचे सव्रेक्षण करण्यात येत आहे. इतकेच नाही तर स्त्रोतांपासून ते जलकुंभार्पयत गेलेल्या वितरण नलीकेचे सव्रेक्षण करण्यात  आहे.कुठे होडीचा तर कुठे दोरचा घ्यावा लागतो आसरापाणी नमुने तपासणी आणि जिओ टॅगिंग करण्यासाठी जाणा:या कर्मचा:यांना कुठे होडीचा तर कुठे दोर लावून पाण्यातून पाणी स्त्रोतार्पयत जाण्याची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. धनपूर येथे एक पाण्याचे स्त्रोत धरण क्षेत्रात होते. तेथील हातपंपातून उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थ पाणी पीत होते. परंतु धनपूर धरण यंदा काठोकाठ भरल्याने हे स्त्रोत पाण्याखाली आहे. जिओ टॅगिंग करतांना तेथे होडीद्वारे जावे लागले. अशीच स्थिती नागसर येथील होती. नागसर धरणात या गावाच्या स्त्रोताच्या विहिरी पाण्यात आल्याने तेथेही स्थानिकांच्या मदतीने कर्मचारी तथा जिल्हातज्ज्ञ नितीन पाटील व अजरून कडवे यांनी दोर बांधून पाण्यात उतरले होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणची तथा दुर्गम भागातील पाणी स्त्रोतांची    आहे. 

जिओ टॅगिंग करतांनाच पाणी नमुने देखील घेतले जात आहेत. मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात असे दोन वेळा पाणी नमुने घेवून त्यांची तपासणी केली जाते. 31 डिसेंबर र्पयत सर्व साडेआठ हजार पाणी स्त्रोतांचे टॅगिंग करून त्यातील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. परंतु पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचा:यांनी मुदतीआधीच संपुर्ण काम करण्याचे नियोजन करून ठेवले आहे. या विभागाच्या नव्याने आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी कर्मचा:यांना प्रोत्साहीत केले असून गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील या कामात जिल्हा अव्वल राहील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.