शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पाणी स्त्रोतच पाण्याखाली जिओ टॅगिंगसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक पाण्याचे स्त्रोत हे नदी, नाल्यांमध्ये तसेच धरणांच्या परिसरात आहेत. अशा ठिकाणी अद्यापही पाण्याचा प्रवाह किंवा पाणी साठलेले असल्यामुळे कर्मचा:यांना जीव धोक्यात घालून जिओ टॅगिंग करावे लागत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे मॅपींग करण्याची मोहिम सध्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीची मोहिम सध्या सुरू करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पहाता पाणी पुरवठा योजनांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे विहिरी, कुपनलिका आणि नाले व झ:यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील सर्वच पाणी स्त्रोतांची तपासणी करून त्यातील पाणी नमुने घेत त्यांचे रासायनिक पृथ:करण केले जात असते. त्यानुसार संबधीत पाण्याचे स्त्रोत हे पिण्यालायक आहे किंवा नाही हे ठरविले जाते. त्यासाठी मात्र प्रत्येक पाणी स्त्रोताची जियोफेनिसिनींग करणे आवश्यक असते. सध्या ते काम सुरू करण्यात आले आहे. त्याला गती देखील देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या कामात नंदुरबार जिल्हा राज्यात अग्रेसर होता. यंदा देखील जिल्हा अव्वल राहण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे.अनेक अडचणीजिल्ह्यातील दोन तालुके संपुर्णपणे डोंगराळ आणि द:याखो:यांचे आहेत. अशा ठिकाणच्या पाणी स्त्रोतांचे जिओ फिनिसिनिंग करण्याचे मोठे दिव्य सध्या कर्मचा:यांसमोर आहे. अनेक ठिकाणी कमरेएवढय़ा पाण्यातून जात पाणी स्त्रोत असलेल्या विहिरी आणि कुपनलिकांर्पयत पोहचावे लागत आहे. काही वेळा स्थानिकांची मदत घ्यावी लागत आहे तर काही वेळा स्वत: कर्मचा:यांनाच जीव धोक्यात घालत जावे लागत आहे. साडेआठ हजार स्त्रोतजिल्ह्यात 591 ग्रामपंचायतीअसून एकुण साडेआठ हजारापेक्षा अधीक पाणी स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणाहून किंवा स्त्रोताहून गाव, पाडय़ातील नागरिक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात ते अधिकृत स्त्रोत मानले जाते. त्यामुळे अशा स्त्रोतांची गाव, पाडे आणि द:याखो:यात जावून निश्चिती करण्यात आली. त्यांची एकुण संख्या 8,644 इतकी आहे. या सर्व स्त्रोतांचे अक्षांश, रेखांश निश्चिती करून त्याचे डिजीटलायङोशन करण्यात येत आहे. अॅप व वेबसाईटद्वारे ते सहज पहाता येत असते. हंगामी, बारमाही व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांचे सव्रेक्षण करण्यात येत आहे. इतकेच नाही तर स्त्रोतांपासून ते जलकुंभार्पयत गेलेल्या वितरण नलीकेचे सव्रेक्षण करण्यात  आहे.कुठे होडीचा तर कुठे दोरचा घ्यावा लागतो आसरापाणी नमुने तपासणी आणि जिओ टॅगिंग करण्यासाठी जाणा:या कर्मचा:यांना कुठे होडीचा तर कुठे दोर लावून पाण्यातून पाणी स्त्रोतार्पयत जाण्याची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. धनपूर येथे एक पाण्याचे स्त्रोत धरण क्षेत्रात होते. तेथील हातपंपातून उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थ पाणी पीत होते. परंतु धनपूर धरण यंदा काठोकाठ भरल्याने हे स्त्रोत पाण्याखाली आहे. जिओ टॅगिंग करतांना तेथे होडीद्वारे जावे लागले. अशीच स्थिती नागसर येथील होती. नागसर धरणात या गावाच्या स्त्रोताच्या विहिरी पाण्यात आल्याने तेथेही स्थानिकांच्या मदतीने कर्मचारी तथा जिल्हातज्ज्ञ नितीन पाटील व अजरून कडवे यांनी दोर बांधून पाण्यात उतरले होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणची तथा दुर्गम भागातील पाणी स्त्रोतांची    आहे. 

जिओ टॅगिंग करतांनाच पाणी नमुने देखील घेतले जात आहेत. मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात असे दोन वेळा पाणी नमुने घेवून त्यांची तपासणी केली जाते. 31 डिसेंबर र्पयत सर्व साडेआठ हजार पाणी स्त्रोतांचे टॅगिंग करून त्यातील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. परंतु पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचा:यांनी मुदतीआधीच संपुर्ण काम करण्याचे नियोजन करून ठेवले आहे. या विभागाच्या नव्याने आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी कर्मचा:यांना प्रोत्साहीत केले असून गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील या कामात जिल्हा अव्वल राहील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.