शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

खरवड येथे 500 फुटांर्पयत पाणी पातळी खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:40 IST

अनेक ठिकाणी कुपनलिकाही आटल्या

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरातील पाणी पातळी खालावली आह़े खरवड, खेडले, त:हावद आदी गावांमध्ये पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थांकडून पाण्यासाठी वणवण करण्यात येत आह़े परिसरात ऊस, केळी आदी पिके घेण्यात आली आहेत़ परंतु पाण्याअभावी पिक करपत असल्याची व्यथा शेतक:यांकडून मांडण्यात येत आह़े ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात परिसरातील महिला तसेच लहान मुल पाण्याच्या कळशा, भांडी घेऊन जाताना दिसून येत असतात़ सुरुवातीलाल 100 फुटांर्पयत खोल गेलेली पाण्याची पातळी आता पाचशे फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थ पाण्याअभावी बेजार झाले आहेत़ खरवड, खेडले व त:हावद या गावांची परिस्थिती अत्यंत वाईट आह़े या परिसरात विहिरीदेखील नाहीत़ परिणामी जलस्त्रोत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आह़ेपरिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत  आहेत. परिसरात विहिरी नसल्याने ग्रामस्थ तसेच शेतक:यांकडून ठिकठिकाणी कुपनलिका करण्यात आल्या आहेत़ परंतु त्यांचीसुध्दा पाणीपातळी खोल गेल्याने त्या आटल्या आहेत़ कृषिपंपातून पाणी पूर्ण क्षमतेने येत नसल्याने येथील पिक धोक्यात आली आहेत़ त्यामुळे साहजिकच पाण्यासाठी शेतक:यांकडून जुळवाजुळव करण्यात येत आह़े यंदा या ठिकाणी जलयुक्त शिवारची मोठी कामे झालेली आहेत़ त्यामुळे भविष्यात याचा फायदा होणार असल्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आह़े हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा वेळेत मान्सून दाखल होणार आह़े परंतु तरीसुध्दा अजून उन्हाळ्याचा साधारणत दीड महिना काढायचा असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या ठिकाणी बराचसा परिसर हा सपाटीवर आह़े त्यामुळे साहजिकच येथे पाण्याची पातळी खालावत असत़े कृषिपंपातून अत्यंत कमी दाबाचे पाणी येत आह़े त्यातच अनेक वेळा महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो़ त्यामुळे शेतक:यांना अजूनच समस्यांचा सामना करावा लागत असतो़ अनेकवेळा जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामस्थ, अबालवृद्धांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लावाव्या लागत आहे. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्यासाठी फिरफिर होत असल्याने साहजिकच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक पशुपालकांचे पाण्यासाठी स्थलांतर झाले आहेत़ ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी जाण्यास पशुपालक पसंती देत असतात़ अनेक पशुपालकांना आपली जनावरे विकण्याचीदेखील वेळ आली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े