शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

दुरुस्तीअभावी पाणी जाते गुजरातमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) दरवाजे गेल्यावर्षीच्या महापुरात वाहून गेल्याने पाणी अडविले जात नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. बहुतांश सिमेंट नाला बांध गाळाने भरले आहेत. पाणी अडविण्याच्या या छोट्या-छोट्या प्रकल्पांकडे होत असलेले दुर्लक्षातच दुष्काळाची कारणे दडली आहेत. केटीवेअर दुरुस्त न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जि.प. सदस्य अजित नाईक यांनी दिला आहे.माजी आमदार सुरूपसिंग नाईक हे संबंधित विभागाला बंधारा दुरूस्तीसाठी अनेकवेळा भेटले. लघुसिंचन अधिकाºयांना केटीवेअर दुरूस्ती करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु कुठेही उपाययोजना तात्काळ करण्यात आली नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जलसाठा सोडण्यात येतो. केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी थेट गुजरात राज्यात वाहून जात आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकºयांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. पाण्याची पातळीही खोल गेली आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. नवापूर तालुक्यातील कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट आल्याचे मानले जात असले तरी पडलेला पाऊस अडविण्यात आला नाही. तालुक्यातील केटीवेअरच्या दरवाजांची स्थिती नाजूक बनली आहे.‘धरण उराशी अन् शेतकरी उपाशी’ अशी परिस्थिती नवागाव गावातील शेतकºयांची झाली आहे. नवापूर तालुक्यातील नागण प्रकल्पाचे सोडलेले पाणी केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी वाहून जाते. धरणाचा पाण्याचा लाभ मिळत नसून धरण केवळ नावालाच आहे. सरपंच व ग्रामपंचायतीकडूनही केटीवेअरची दुरूस्तीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून उपाययोजना झाली नाही. पाण्यासाठी आदिवासी शेतकरी वर्ग मरमर करीत आहे. जलसंपदा विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नवागावच्या सरपंच शर्मिला प्रकाश नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.केटीवेअर दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे तरीही दुरूस्ती होत नाही. दरवाजे बसवले नाही. नवापूर तालुक्यातील आदिवासी शेतकरी पाण्याच्या समस्याने अडचणीत आला आहे. जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही ही शोकांतिका आहे. महाराष्ट्र राज्यातील पाणी महाराष्ट्रातील शेतकºयाला मिळत नसून गुजरात राज्यात निघून जाते. गेल्या दोन वर्षापासून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसून त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकरी आंदोलन करतील.-अजित नाईक, जि.प. सदस्य, उमराण गट, ता.नवापूर.