शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दुरुस्तीअभावी पाणी जाते गुजरातमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नवापूर तालुक्यातील नवागाव गावाजवळील सरपणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (केटीवेअर) दरवाजे गेल्यावर्षीच्या महापुरात वाहून गेल्याने पाणी अडविले जात नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. बहुतांश सिमेंट नाला बांध गाळाने भरले आहेत. पाणी अडविण्याच्या या छोट्या-छोट्या प्रकल्पांकडे होत असलेले दुर्लक्षातच दुष्काळाची कारणे दडली आहेत. केटीवेअर दुरुस्त न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जि.प. सदस्य अजित नाईक यांनी दिला आहे.माजी आमदार सुरूपसिंग नाईक हे संबंधित विभागाला बंधारा दुरूस्तीसाठी अनेकवेळा भेटले. लघुसिंचन अधिकाºयांना केटीवेअर दुरूस्ती करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु कुठेही उपाययोजना तात्काळ करण्यात आली नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जलसाठा सोडण्यात येतो. केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी थेट गुजरात राज्यात वाहून जात आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकºयांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. पाण्याची पातळीही खोल गेली आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. नवापूर तालुक्यातील कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट आल्याचे मानले जात असले तरी पडलेला पाऊस अडविण्यात आला नाही. तालुक्यातील केटीवेअरच्या दरवाजांची स्थिती नाजूक बनली आहे.‘धरण उराशी अन् शेतकरी उपाशी’ अशी परिस्थिती नवागाव गावातील शेतकºयांची झाली आहे. नवापूर तालुक्यातील नागण प्रकल्पाचे सोडलेले पाणी केटीवेअर नादुरुस्त असल्याने ते पाणी वाहून जाते. धरणाचा पाण्याचा लाभ मिळत नसून धरण केवळ नावालाच आहे. सरपंच व ग्रामपंचायतीकडूनही केटीवेअरची दुरूस्तीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून उपाययोजना झाली नाही. पाण्यासाठी आदिवासी शेतकरी वर्ग मरमर करीत आहे. जलसंपदा विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नवागावच्या सरपंच शर्मिला प्रकाश नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.केटीवेअर दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे तरीही दुरूस्ती होत नाही. दरवाजे बसवले नाही. नवापूर तालुक्यातील आदिवासी शेतकरी पाण्याच्या समस्याने अडचणीत आला आहे. जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही ही शोकांतिका आहे. महाराष्ट्र राज्यातील पाणी महाराष्ट्रातील शेतकºयाला मिळत नसून गुजरात राज्यात निघून जाते. गेल्या दोन वर्षापासून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसून त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकरी आंदोलन करतील.-अजित नाईक, जि.प. सदस्य, उमराण गट, ता.नवापूर.