शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

धडगाव परिसरात लोकसहभागातून जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविले जाते आणि हे पाणी पिकांना सिंचनासाठी वापरले जाते. निक्रा ...

शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविले जाते आणि हे पाणी पिकांना सिंचनासाठी वापरले जाते. निक्रा प्रकल्पांतर्गत लोकांच्या सहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले. या पाण्याचा उपयोग हरभरा, तूर, भाजीपाला यासारख्या पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी होतो. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षमपणे करण्यासाठी रेनपाइप सिंचनप्रणालीचा वापर होत आहे. हे वनराई बंधारे बांधण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा उपयोग केला जातो. हे बंधारे बांधण्यासाठी नाल्यातील जागांची निश्चिती कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाने सुचविण्यात आल्या होत्या. त्या सर्व ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यासाठी रिकाम्या गोण्यांचा वापर करण्यात आला. गोण्यांमध्ये नदीपात्रातील रेती भरली जाते आणि त्याच्या दोन ओळी आडव्या टाकल्या जातात. त्या ओळीमध्ये चिकणमाती भरावी लागते. अशापद्धतीने कमी खर्चात वनराई बंधारे बांधता येतात. वनराई बंधारे साखळीपद्धतीने बांधल्यास नदी व नाल्याच्या पात्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होतो. वनराई बंधारे हे अत्यंत कमी खर्चिक असलेली पद्धत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, अरुण कदम यांनी मार्गदर्शन केले. भुजगाव येथील छोटूलाल पावरा, रमेश पावरा, विजय पावरा, किसन भिल, शंकर भिल, चमाऱ्या भिल, लेहेऱ्या पावरा यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या सहभागाने बंधारे बांधले आहेत.