शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

७० वर्षांपासून ग्रामस्थांना ‘केवळ’ रस्त्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात स्थित चिखलीचा आमखेडीपाडा या अतीदुर्गम भागात सुविधांचा अभाव आहे़ देशाला स्वातंत्र्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात स्थित चिखलीचा आमखेडीपाडा या अतीदुर्गम भागात सुविधांचा अभाव आहे़ देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होऊन अंधकामय असलेल्या या पाड्यात उजेड देण्याचे काम तेथील भूमिपूत्रांनी घेतले असून शिक्षण घेतलेले हे नवे शिलेदार शासनदरबारी समस्यांची उजळणी करुन पाठपुरावा करत आहेत़धडगाव तालुक्याच्या उत्तरेला बिलगाव परिसरात चिखली हे गाव आहे़ तेथून ९ किलोमीटर अंतरावर आमखेडीपाडा अंतरावर आहे़ डोंगर आणि वनाने वेढलेल्या आमखेडीपाडा येथे ४०० नागरिकांची वस्ती आहे़ सातपुड्यातील पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचीही सोय नाही़ पाटीलपाडा येथून आमखेडीपाडा येथे जाणाऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागतो़ पाड्यापर्यंत पक्का रस्ता झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य असल्याने येथील शिक्षित युवकांनी पुढे शासनाकडे दाद मागणे सुरु केले आहे़ या युवकांनी पुढाकार घेत नुकतीच जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन अडचणी मांडल्या होत्या त्यावर कारवाई कधी होणार याची अद्याप खात्री नसली तरी कारवाई होणार अशी अपेक्षा आहे़गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या निकाली काढली जावी यासाठी, येथील युवक पुढे आले असून त्यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरु झाला आहे़ दैनंदिन अडचणींवर मात करत गेल्या १५ वर्षात धडगावपर्यंत जाऊन शिक्षण घेत पुढे आलेल्या या युवकांनी गाव-पाड्याच्या विकासासाठी नेमके काय, करता येईल याची चर्चा करुन पाठपुरावा सुरु केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना रस्ता ही एकमेव महत्त्वपूर्ण समस्या असल्याचे पटवून देण्यात आले़ येथे रस्ता निर्मिती झाल्यानंतर प्रशासना हातपंप, कूपनलिका, शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळा, बालविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम घेता येतील अशी अपेक्षा या युवकांकडून व्यक्त करण्यात आली आहे़रस्ता नसल्याने येथील उपचारासाठी धडगावपर्यंत जाणाºया गर्भवती माता, रुग्ण, महिला, वृद्ध यांची आबाळ होत आहे़ गावात पिण्याच्या पाण्याचा कोणताही कृत्रिम स्त्रोत नाही़ अनेक वर्षांपासून हीच स्थिती असली तरी या गावासाठी आजवर विकासकामेच मंजूर नसावीत, का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे़ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत चौकशी करण्याची मागणी आहे़आमखेडीपाडा येथील धनसिंग लेहºया पावरा, मेयसिंग एल पावरा, प्रकाश पावरा, दारासिंग पावरा, राकेश पावरा, दिनेश पावरा या युवकांनी हे निवेदन दिले आहे़प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाटीलपाडा ते आमखेडीपाडा रस्ता झाल्यास विद्यार्थ्यांचीही सोय होईल़