शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

जयनगर : शहादा तालुक्यात दोन आठवड्यांहून जास्त कालावधी उलटला तरी दोन-चार गावे वगळता संपूर्ण तालुक्यात अजूनही पाऊस न ...

जयनगर : शहादा तालुक्यात दोन आठवड्यांहून जास्त कालावधी उलटला तरी दोन-चार गावे वगळता संपूर्ण तालुक्यात अजूनही पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेची भर पडली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे अशीच परिस्थिती असताना शहादा तालुक्यात हा प्रश्‍न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी तर अजून पेरणीलासुद्धा सुरुवात झालेली नाही.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शहादा तालुक्यात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली होती. नंतर १० ते १२ दिवस होऊनही पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे व लागवडीचे संकट ओढवले होते. दुबार पेरणी व लागवड झाल्यावर आता पुन्हा दोन आठवड्यांचा कालावधी उलटून पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे, तर जुलै महिन्यात आजच्या दिवशी दोन-तीन ठिकाणे वगळता इतर गावांमध्ये एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुरुवातीला पेरणीची कामे आटोपलेल्या शेतकऱ्यांवर पाऊस नसल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी अगोदरच दुबार पेरणी व लागवड केली असून, त्यांच्यावर तिबार पेरणी व लागवडीचे संकट ओढवले आहे.

शहादा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवसांत सर्वत्र पाऊस न झाल्यास६ दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकचा आधार असल्याने ते पिके तग धरून आहेत. मात्र त्यांची वाढ खुंटली आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून, ती पावसाअभावी करपू लागली आहेत. दोनदा महागडी बियाणे खरेदी करून केलेल्या पेरण्या व लागवड वाया जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत रूतला आहे.

कापूस, मका, ज्वारी, पपई, ऊस, मिरची, केळी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. कर्ज काढून लागवड व पेरणी केली असून, कर्जाचे पैसे फेडायचे कसे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने दुबार पेरणी ओढवलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच कृषी विभागाने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकरी वर्गाकडून होत आहे.