शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असून, त्यांनाही तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.याप्रकरणी या नुकसानग्रस्त कुटुंबांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पजर्न्यवृष्टी होवून खर्डी नदीला मोठा पूर आला होता. यामुळे पुराचे पाणी नदी काठालगत वसलेल्या कालिका माता परिसरातील अनेक घरांमध्ये शिरून घरांचे नुकसान झाले होते. याशिवाय संसारोपयोगी सामान व धान्यदेखील वाहून गेले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे केल असले तरी हे पंचनामे करतांना मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. कारण पथकातील कर्मचा:यांनी एकाच ठिकाणी बसून पंचनामे केले आहे. त्यामुळे या पथकाने ज्यांची नावे सांगितले त्यांचीच पंचनामे केले आहेत. परंतु जी नुकसानग्रस्तांची यादी आपणाकडे दिली होती. ती कुटुंबे खरोखर नदी किणारी राहत असून, त्यांनाच वगळण्यात आले आहे. साहजिकच बहुसंख्य कुटुंबे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. आपल्या स्तरावर तातडीने चौकशी करून राहिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी दुजाभावातून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यातआल्याचा आरोपही महिलांनी केला होता.याप्रसंगी अंबालाल साठे, युवा शक्तीचे विनोद माळी व नुकसानग्रस्त उपस्थित होते.

4शहातील खर्डी नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आतापावेतो 550 कुटुंबांना साधाण 17 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. अजूनही मोठय़ा प्रमाणात क्षतीग्रस्त कुटुंबे राहिली आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. हा निधी आल्यावर लगेच वाटप करण्यात येणार असलल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान येथील प्रशासनाने पाठविलेल्या निधीच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून निधी उपलब्ध करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.