शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार वनपट्टेधारकांना सातबाऱ्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना दाद दिली जात नसल्याची त्यांची व्यथा आहे. निदान जिल्हाधिकाºयांनी तरी त्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर फुंकर घालून मार्गी लावावा, अशी त्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, गढीकोठडा, रापापूर, चौगांव खुर्द, वाल्हेरी, माळखुर्द, मनीबेली, केलवापाणी, रावलापाणी, कोठार, बंधारा, अलवान, राणीपूर, वरपाडा, तयाचापळा ढेकाटी, सितापावली, सोमावल खुर्द, इच्छागव्हाण, एकधड, धजापाणी, बोरवण, टाकळी आदी सातपुड्यातील गावांमधील वनअतिक्रमणधारक शेतकरी १९८० पासून वनजमीन खेडत होते. गेल्या ३५ वर्षांच्या शासनाविरोधाच्या लढ्यानंतर न्यायालयाचा आदेशाने त्यांना २०१५ मध्ये या जमिनी मिळाल्या. त्यानंतर शासनाने पुढील कार्यवाही केल्यानंतर सदर वन अतिक्रमितांना ताबा पावत्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही प्रशासनाकडून या शेतकºयांना सातबारे देण्यात आलेले नाहीत. सातबाºयांसाठी गेल्या पाच वर्षांपासून सारखे ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे थेटे घालत आहेत. तुमच्या जमिनीच्या मोजनीबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच सातबारे मिळतील, असे पोकळ आश्वासन देऊन त्यांची आजतागायत बोळवण केली जात असल्याचे हे शेतकरी सांगतात.वास्तविक सातबारा हा शेतकºयांचा प्रॉपर्टीच्या प्रमुख आरसा असतो. त्यांच्यावरच त्यांची बाजारात पत असते. परनतु त्याच्यासाठी आदिवासी शेतकºयांना महसूल प्रशासनो जंग-जंग पछाडले आहे. हक्काची जमीन असतांना केवळ सातबाºयाअभावी त्यांना शासनाच्या योजनांपासूनदेखील उपेक्षित राहावे लागत आहे. एकीकडे सरकार शेतकºयांचा वाली असलल्याचा डिंडोरा पिटत असते तर दुसरीकडे त्यांचेच प्रशासन त्यांचा जाच करीत असल्याचा आरोप वनपट्टेधारकांनी केला आहे.सरकारनेच आम्हाला जमिनीची ताबा पावती दिली आहे. मग तात्काळ सातबारा का दिला जात नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडे हेलपाटे मारून अक्षरश: थकलो असून, आता जिल्हा प्रशासनाने तरी यावर तातडीने ठोस कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तंबी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान गेल्या आठवड्यातही या प्रकरणी तहसीलदारांनी भेट देऊन सातबारे देण्याची मागणी केली होती. त्यांनी आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकºयांनी सांगितले.

शासनाने ताबा पावती दिली असली तरी सातबारा नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला सावकाराची दाढी धरावी लागते. तोही मनमानी अव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे देत असतो. इकडे प्रशासन म्हणते ताबा पावतीवरदेखील कर्ज देण्याचा शासनाचा आदेश आहे. परंतु तिकडे बँका म्हणतात तुमच्या जवळ सातबारा नाही तर बँकेचा बोजारा कशावर चढवायचा. बोजा चढविल्याशिवाय पीक कर्जच देणार नाही, असा सज्जड दम दिला जात असल्याचे शेतकरी सांगतात. या दोन्ही यंत्रणांच्या जाचामुळे शेतकरी अक्षरश: वैतागले आहेत. बँकांच्या कर्जाबाबत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व वनपट्टे धारकांचा समन्वय साधून त्यात मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.