शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

चार हजार वनपट्टेधारकांना सातबाऱ्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना दाद दिली जात नसल्याची त्यांची व्यथा आहे. निदान जिल्हाधिकाºयांनी तरी त्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर फुंकर घालून मार्गी लावावा, अशी त्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, गढीकोठडा, रापापूर, चौगांव खुर्द, वाल्हेरी, माळखुर्द, मनीबेली, केलवापाणी, रावलापाणी, कोठार, बंधारा, अलवान, राणीपूर, वरपाडा, तयाचापळा ढेकाटी, सितापावली, सोमावल खुर्द, इच्छागव्हाण, एकधड, धजापाणी, बोरवण, टाकळी आदी सातपुड्यातील गावांमधील वनअतिक्रमणधारक शेतकरी १९८० पासून वनजमीन खेडत होते. गेल्या ३५ वर्षांच्या शासनाविरोधाच्या लढ्यानंतर न्यायालयाचा आदेशाने त्यांना २०१५ मध्ये या जमिनी मिळाल्या. त्यानंतर शासनाने पुढील कार्यवाही केल्यानंतर सदर वन अतिक्रमितांना ताबा पावत्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही प्रशासनाकडून या शेतकºयांना सातबारे देण्यात आलेले नाहीत. सातबाºयांसाठी गेल्या पाच वर्षांपासून सारखे ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे थेटे घालत आहेत. तुमच्या जमिनीच्या मोजनीबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच सातबारे मिळतील, असे पोकळ आश्वासन देऊन त्यांची आजतागायत बोळवण केली जात असल्याचे हे शेतकरी सांगतात.वास्तविक सातबारा हा शेतकºयांचा प्रॉपर्टीच्या प्रमुख आरसा असतो. त्यांच्यावरच त्यांची बाजारात पत असते. परनतु त्याच्यासाठी आदिवासी शेतकºयांना महसूल प्रशासनो जंग-जंग पछाडले आहे. हक्काची जमीन असतांना केवळ सातबाºयाअभावी त्यांना शासनाच्या योजनांपासूनदेखील उपेक्षित राहावे लागत आहे. एकीकडे सरकार शेतकºयांचा वाली असलल्याचा डिंडोरा पिटत असते तर दुसरीकडे त्यांचेच प्रशासन त्यांचा जाच करीत असल्याचा आरोप वनपट्टेधारकांनी केला आहे.सरकारनेच आम्हाला जमिनीची ताबा पावती दिली आहे. मग तात्काळ सातबारा का दिला जात नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडे हेलपाटे मारून अक्षरश: थकलो असून, आता जिल्हा प्रशासनाने तरी यावर तातडीने ठोस कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तंबी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान गेल्या आठवड्यातही या प्रकरणी तहसीलदारांनी भेट देऊन सातबारे देण्याची मागणी केली होती. त्यांनी आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकºयांनी सांगितले.

शासनाने ताबा पावती दिली असली तरी सातबारा नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला सावकाराची दाढी धरावी लागते. तोही मनमानी अव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे देत असतो. इकडे प्रशासन म्हणते ताबा पावतीवरदेखील कर्ज देण्याचा शासनाचा आदेश आहे. परंतु तिकडे बँका म्हणतात तुमच्या जवळ सातबारा नाही तर बँकेचा बोजारा कशावर चढवायचा. बोजा चढविल्याशिवाय पीक कर्जच देणार नाही, असा सज्जड दम दिला जात असल्याचे शेतकरी सांगतात. या दोन्ही यंत्रणांच्या जाचामुळे शेतकरी अक्षरश: वैतागले आहेत. बँकांच्या कर्जाबाबत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व वनपट्टे धारकांचा समन्वय साधून त्यात मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.