शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सेवेच्या बाबतीत नेहमीच उपेक्षित मोलगी ता. अक्कलकुवा येथील कार्यालयाला थेट कुलूप लागले आहे. परिणामी समस्या दुपटीने वाढल्या आहे.जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून या विभागामार्फत मोबाइल ग्राहक, लॅण्डलाईन व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही देण्यात आले आहे. या सेवेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टॉवर उभारले आहे. त्यात दुर्गम भागातील १२ टॉवरचा समावेश आहे. सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. खर्च कमी करण्यासाठी दूरसंचार विभागाने हजारो कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कर्मचाºयांना निवृत्ती देण्यात आली आहे.स्वेच्छा निवृत्तीमुळे पगारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. परंतु सेवेबाबत मात्र अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात दुर्गम भागातील ग्राहकांना नियमित व सुरळीत सेवा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून ेसेवेबाबत नेहमीच ओरड होत होती. नियमित कर्मचारी राहत असतानाही सेवा मिळत नसल्याने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. तरीही त्यात अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. असे असतानाच कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश टॉवर बेवारस अवस्थेत पडले आहे. तर मोलगी येथील कार्यालयालाच कुलूप लागले आहे. त्यामुळे दूरसंचारच्या सेवेत येणºया समस्यांमध्ये पुन्हा दुपटीने भर पडली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे, ही बाब टाळण्यासाठी तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.सेवा देण्यात नेहमीच दुजाभाव होणाºया मोलगी येथील ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना केबलही नादुरुस्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत खंडीतपणे होणारी सेवाही मिळत नाही. त्यातच स्वेच्छा निवृत्तीही दिली गेल्याने सेवेची वाताहत निर्माण झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच त्रुट्या दूर करण्याची मागणी तेथील ग्राहकांकडून होत आहे.धडगाव तालुक्यातही ग्राहकांना मिळते खंडीत सेवा.प्रशासकीय आॅनलाईन कामांमध्ये मोठा अडथळा.बॅँकेच्या कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या नाहक भूर्दंड व वाढल्या फेºया.युवक-युवती अनेक संधींना मुकतात.अंगणवाडी कर्मचाºयांना अहवाल वेळेवर सादर करता येत नाही.खराब झालेले सिमकार्ड पुनर्स्थापित होत नाही.शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.