शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधि; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सेवेच्या बाबतीत नेहमीच उपेक्षित मोलगी ता. अक्कलकुवा येथील कार्यालयाला थेट कुलूप लागले आहे. परिणामी समस्या दुपटीने वाढल्या आहे.जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून या विभागामार्फत मोबाइल ग्राहक, लॅण्डलाईन व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही देण्यात आले आहे. या सेवेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टॉवर उभारले आहे. त्यात दुर्गम भागातील १२ टॉवरचा समावेश आहे. सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. खर्च कमी करण्यासाठी दूरसंचार विभागाने हजारो कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कर्मचाºयांना निवृत्ती देण्यात आली आहे.स्वेच्छा निवृत्तीमुळे पगारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. परंतु सेवेबाबत मात्र अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात दुर्गम भागातील ग्राहकांना नियमित व सुरळीत सेवा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून ेसेवेबाबत नेहमीच ओरड होत होती. नियमित कर्मचारी राहत असतानाही सेवा मिळत नसल्याने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. तरीही त्यात अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. असे असतानाच कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश टॉवर बेवारस अवस्थेत पडले आहे. तर मोलगी येथील कार्यालयालाच कुलूप लागले आहे. त्यामुळे दूरसंचारच्या सेवेत येणºया समस्यांमध्ये पुन्हा दुपटीने भर पडली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे, ही बाब टाळण्यासाठी तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.सेवा देण्यात नेहमीच दुजाभाव होणाºया मोलगी येथील ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना केबलही नादुरुस्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत खंडीतपणे होणारी सेवाही मिळत नाही. त्यातच स्वेच्छा निवृत्तीही दिली गेल्याने सेवेची वाताहत निर्माण झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच त्रुट्या दूर करण्याची मागणी तेथील ग्राहकांकडून होत आहे.धडगाव तालुक्यातही ग्राहकांना मिळते खंडीत सेवा.प्रशासकीय आॅनलाईन कामांमध्ये मोठा अडथळा.बॅँकेच्या कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या नाहक भूर्दंड व वाढल्या फेºया.युवक-युवती अनेक संधींना मुकतात.अंगणवाडी कर्मचाºयांना अहवाल वेळेवर सादर करता येत नाही.खराब झालेले सिमकार्ड पुनर्स्थापित होत नाही.शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.