शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्हा परिषदेला लाचखोरीचा व्हायरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे जिल्ह्यातून जेव्हा नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाला त्यावेळी जिल्हा निर्मितीच्या हरकतींची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे जिल्ह्यातून जेव्हा नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाला त्यावेळी जिल्हा निर्मितीच्या हरकतींची सुनावणी सुरू असताना एका आदिवासी महिलेने बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, ‘आमचा जिल्हा करा पण या नवीन जिल्ह्यात भास्कर वाघला येऊ देऊ नका’ तिची ही प्रतिक्रिया त्यावेळी खूप चर्चेची ठरली होती. पण दुर्दैव नंदुरबार जिल्हा झाल्यानंतर या जिल्हा परिषदेतही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भास्कर वाघचा शिरकाव होत असल्याने तो सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा परिषदेतील तीन मोठे अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडल्याने आता त्याबाबत सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही जिल्हा परिषद जलसंधारणाच्या कामातील गैरव्यवहारावरुन गाजली. या गैरव्यवहारासंदर्भात तत्कालिन खासदार माणिकराव गावीत यांनीच तक्रारी केल्या होत्या. तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील यांनीदेखील या तक्रारींचे समर्थन केले होते. ही बाब स्वत: त्यावेळचे महाराष्टÑ राज्य जलसंधारण समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा विषय गाजला. त्यावेळी स्व.नाईक यांनी या कामाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली होती. पण गंमतीची बाब म्हणजे भ्रष्टाचाराची साखळी इतकी खोलवर रुजलेली असते की, संबंधित यंत्रणेने ती समितीच बेकायदेशीर असल्याचे ठरवून बरखास्त करणारे आदेश शासनाकडून आणले. त्यामुळे जलसंधारणातील कथित गैरव्यवहार तेथेच मुरला.पुढे छोट्या-मोठ्या गोष्टी घडतच राहिल्या. गेल्या चार-पाच वर्षापूर्वी जिल्ह्यात विहीर घोटाळ्याचे प्रकरण गाजले. आदिवासी लाभार्थींना विहीर न खोदताच बोगस कागदपत्र तयार करून कोट्यवधींची रक्कम हडप करण्यात आली. हा कारनामा देखील जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने केला होता. अर्थात योजना दुसºया विभागाची असताना असे घडले होते.आता गेल्या १५ दिवसात जिल्हा परिषदेतीलच तीन मोठे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. नंदुरबार आणि शहादा पंचायत समितीतील बांधकाम विभागातील अभियंत्यांनी ठेकेदारांना कामाचे बिल मंजूर करताना त्यांच्याकडून टक्केवारीची मागणी केली. त्यात ते अडकले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून मागितलेली रक्कम व तेथील उदाहरणे पाहता जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील बिले मंजूर करताना संबंधित अभियंते अडीच टक्के रक्कम घेत असल्याचे या घटनेतून समोर आले. त्यातील वास्तवता हा तपासानंतर समोर येईलच पण या घटना जिल्हा परिषदेतील व्यवहारावर संशय निर्माण करणाºया निश्चितच ठरल्या. या दोन घटनांची चर्चा संपत नाही तोच गुरुवारी नवापूरला तालुका वैद्यकीय अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. गरोदर मातांची शासकीय योजनेअंतर्गत सोनोग्राफी करणाºया डॉक्टरांकडूनच प्रती पेशंट ठराविक रक्कम मागण्याचा हा प्रकार समोर आला.एकूणच हे प्रकार लक्षात घेता प्रत्येक योजनेचे अनुदान देताना त्यात डल्ला मारणाºयांची कमी नसल्याचे दिसून येते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तीन महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात अर्थकारणही ठप्प झाले आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळत असल्याचे प्रकरणे समोर आल्याने ती सर्वांसाठीच चिंतेची बाब असून त्याबाबत आता सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.