शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

व्यासयिकांनी स्वच्छेने काढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अतिक्रमणधारकांनी स्वत:च अतिक्रमण काढत पालिकेला सहकार्य केले. यामुळे पालिकेचा वेळ व आर्थिक खर्च वाचला.शहाद्याच्या प्रमुख रस्ते व अन्य भागात व्यवसायिकांनी आपला व्यवसाय उभारला होता. यामुळे मुख्य रस्त्यांवर रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यात भाजी मार्केट, मेन रोड, चार रस्ता, डोंगरगाव रोड, स्टेट बँक परिसर, खेतिया रोड आदी भागात मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले असून ते कच्चे व पक्के दोन्ही प्रकारचे असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याचे संबाधित व्यापाऱ्यांना पालिकेमार्फत आवाहन करण्यात आले होते. त्याला साद देत अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे.प्रशासनातर्फे शहरात फेरी काढून राहिलेले अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले. अतिक्रमण न काढल्यास पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल व अतिक्रमण धारकांकडूनच खर्च वसूल करण्यात येईल असेही सांगण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन पाटील, माधव गाजरे, मंडळाधिकारी प्रमोद अमृतकर, अभियंता संदीप टेंभेकर, आशिष महाजन, संदीप चौधरी, सचिन महाडिक, राजू चव्हाण व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.मागील वर्षी तत्कालीन प्रशासनानेही शहरात वाढलेली अतिक्रमणे काढली होती. मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे अतिक्रमणे पुन्हा वाढले. या वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहाद्याची ओळख बदलू लागली होती. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यवसायिकांच्या बाबतीत दुजाभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वच अतिक्रमण काढायवे अशी सामान्य जनतेची मागणी आहे. शिवाय पक्के अतिक्रमणही काढून सर्वसामान्यांना पालिका प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरात किरकोळ व्यवसायिकांची संख्या अधिक आहेत. त्यात लोटगाडीधारक व टपरीधारकांचा समावेश आहे. हे व्यवसायिक आपला व्यवसाय रस्त्यावर थाटत आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. म्हणून या लॉरी धारकांना पालिका प्रशासनाने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतूक मोकळी होईल.काढलेल्या टपºया व लाºया सर्व अतिक्रमण धारकांनी प्रेस मारुती मैदान, स्टेट बँक परिसर, पंचायत समिती कार्यालय व त्या समोरील कृषी विभाग, जलसंधारण व लघुपाटबंधारे कार्यालच्या मोकळ्या जागेत आणून ठेवल्या आहेत. काही दिवसात अतिक्रमण परत पूर्ववत करू आणि या जागेवरून उचलून परत पूर्ववत जागेवर ठेऊ अशा आशेने अतिक्रमण धारकांनी टपºया जवळपासच ठेवल्या आहे.