शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमंच’मध्ये विस्थापितांनी मांडले विविध प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:54 IST

नर्मदा आंदोलन लोकमंच उपक्रम : उमेदवारांऐवजी त्यांचे प्रतिनिधी होते उपस्थित

तळोदा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची भुमिका मांडण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे लोकमंच हा उपक्रम शहादा तालुक्यातील (वाडी) जीवननगर पुनर्वसन वसाहतीत घेण्यात आला. सरदार सरोवर विस्थापित मणिबेली पासून भादलपर्यंतच्या सर्व ३३ गावातील मुख्य प्रतिनिधी, ११ पुनर्वसन वसाहतींचे जवळपास दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते.भाजप उमेदवाराच्या वतीने डॉ.कांतीलाल टाटीया, काँग्रेस उमेदवाराच्या वतीने माजी मंत्री पद्माकर वळवी, भारतीय ट्रायबल पार्टीच्या उमेदवाराच्या वतीने प्रमोद नाईक तसेच गावगावचे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक मेधा पाटकर व ओरसिंग पटले यांनी केले.डॉ.कांतीलाल टाटिया व अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. यानंतर उपस्थित लोकांनी गावगावातले मुख्य प्रश्न विचारले त्यात नर्मदेच्या विस्थापितांचे पुनर्वसन झाले आहे का? नसल्यास धरणाचे लोकार्पण कसे झाले?, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात ज्यामुळे वनांवरून ११ लाख आदिवासी कुटूंबाना स्वत:च्या जमिनीवरून हाकलून लावण्याचा निर्णय दिला? त्याबद्दल दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना काय वाटतं? अहिंसक आंदोलनावर खोट्या केसेस करून ३०७ चे खोटे कलम लावून १९९५ ची आंदोलनाची केस उकरून आंदोलनातील कार्यकर्ते व विस्थापित आदिवासीला होळीच्या आदल्या दिवशी अचानकपणे अटक कशी केली?हे योग्य आहे का?, मध्यम प्रकल्पासंदर्भात नर्मदेचे पाणी गुजरातला देऊन टाकण्याचा निर्णयाबाबतची काय भूमिका आहे?, मूळ गाव व पुनर्वसन वसाहतीतील आरोग्य दवाखाने, त्यातील रिक्त पदे, व मूलभूत सोयीसुविधा आजपर्यंत का दिल्या गेल्या नाहीत?, २५ वर्षांपासून चालत असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान संचालित नर्मदेच्या जीवनशाळांना आजपर्यंत अनुदान का दिले नाही?, जीवनशाळांना सर्व शिक्षा अभियान का लागू केले जात नाही?, धरणाच्या बॅकवॉटर मुळे सावऱ्या दिगर तसेच इतर टापू क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात तसेच सावºया दिगरच्या पुलाचे बांधकाम गेल्या १० वर्षांपासून ठप्प का आहे?, नर्मदेच्या जलाशयावर ठेका नेमका कुणाचा व मत्स्यसंघ बनण्याचे अधिकार विस्थापिताना मिळालेच पाहिजे?याबद्दलची भूमिका, जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र यात येणाºया अडचणी. पक्षांच्या जाहीरनाम्यात ग्रामस्वराज्याची व्याख्या, अयोध्या मंदिर प्रश्न, पुलवामा हल्ला संदर्भात हिंसेसंदर्भात नेमक्या भूमिका.असे विविध प्रश्न विस्थापित आदिवासींकडून तसेच इतर लोकांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून आलेल्या प्रतिनिधींना केले. त्यावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सविस्तरपणे उत्तरे दिली.आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी समारोप केला व १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.