शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘लोकमंच’मध्ये विस्थापितांनी मांडले विविध प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:54 IST

नर्मदा आंदोलन लोकमंच उपक्रम : उमेदवारांऐवजी त्यांचे प्रतिनिधी होते उपस्थित

तळोदा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची भुमिका मांडण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे लोकमंच हा उपक्रम शहादा तालुक्यातील (वाडी) जीवननगर पुनर्वसन वसाहतीत घेण्यात आला. सरदार सरोवर विस्थापित मणिबेली पासून भादलपर्यंतच्या सर्व ३३ गावातील मुख्य प्रतिनिधी, ११ पुनर्वसन वसाहतींचे जवळपास दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते.भाजप उमेदवाराच्या वतीने डॉ.कांतीलाल टाटीया, काँग्रेस उमेदवाराच्या वतीने माजी मंत्री पद्माकर वळवी, भारतीय ट्रायबल पार्टीच्या उमेदवाराच्या वतीने प्रमोद नाईक तसेच गावगावचे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक मेधा पाटकर व ओरसिंग पटले यांनी केले.डॉ.कांतीलाल टाटिया व अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. यानंतर उपस्थित लोकांनी गावगावातले मुख्य प्रश्न विचारले त्यात नर्मदेच्या विस्थापितांचे पुनर्वसन झाले आहे का? नसल्यास धरणाचे लोकार्पण कसे झाले?, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात ज्यामुळे वनांवरून ११ लाख आदिवासी कुटूंबाना स्वत:च्या जमिनीवरून हाकलून लावण्याचा निर्णय दिला? त्याबद्दल दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना काय वाटतं? अहिंसक आंदोलनावर खोट्या केसेस करून ३०७ चे खोटे कलम लावून १९९५ ची आंदोलनाची केस उकरून आंदोलनातील कार्यकर्ते व विस्थापित आदिवासीला होळीच्या आदल्या दिवशी अचानकपणे अटक कशी केली?हे योग्य आहे का?, मध्यम प्रकल्पासंदर्भात नर्मदेचे पाणी गुजरातला देऊन टाकण्याचा निर्णयाबाबतची काय भूमिका आहे?, मूळ गाव व पुनर्वसन वसाहतीतील आरोग्य दवाखाने, त्यातील रिक्त पदे, व मूलभूत सोयीसुविधा आजपर्यंत का दिल्या गेल्या नाहीत?, २५ वर्षांपासून चालत असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान संचालित नर्मदेच्या जीवनशाळांना आजपर्यंत अनुदान का दिले नाही?, जीवनशाळांना सर्व शिक्षा अभियान का लागू केले जात नाही?, धरणाच्या बॅकवॉटर मुळे सावऱ्या दिगर तसेच इतर टापू क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात तसेच सावºया दिगरच्या पुलाचे बांधकाम गेल्या १० वर्षांपासून ठप्प का आहे?, नर्मदेच्या जलाशयावर ठेका नेमका कुणाचा व मत्स्यसंघ बनण्याचे अधिकार विस्थापिताना मिळालेच पाहिजे?याबद्दलची भूमिका, जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र यात येणाºया अडचणी. पक्षांच्या जाहीरनाम्यात ग्रामस्वराज्याची व्याख्या, अयोध्या मंदिर प्रश्न, पुलवामा हल्ला संदर्भात हिंसेसंदर्भात नेमक्या भूमिका.असे विविध प्रश्न विस्थापित आदिवासींकडून तसेच इतर लोकांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून आलेल्या प्रतिनिधींना केले. त्यावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सविस्तरपणे उत्तरे दिली.आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी समारोप केला व १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.