शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जलदिनानिमित्त जल दौडसह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. जलसाक्षरता सप्ताहाचा जलदौडने समारोप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  पंचायत समिती सभागृहात आयोजित जलजागृती सप्ताहाच्या समारोप उपक्रमात ते बोलत होते. त्यापूर्वी जलदौड काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, देवेंद्र जोशी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, पाणी हा महत्वाचा घटक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाबाबत सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि लोकजागृतीला महत्व दिले पाहिजे. जलबचतीचा संदेश जनतेर्पयत पोहोचवून अधिकाधिक परिवर्तनावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विनय गौडा यांनी सांगितले, दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाण्यासाठीच्या संघर्षात वाढ होत आहे. पाण्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे पाणी बचतीचे महत्व प्रत्येकाने जाणावे आणि त्यादृष्टीने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रास्ताविक देवेंद्र जोशी यांनी केले. सकाळी जलजागृती दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी व सर्व अधिका:यांनी त्यात सहभाग घेतला.