शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या तिलालीच्या सरपंच वंदना सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

वंदनाताई यांना माहेरूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील लामकाणीचे माजी उपसरपंच होते. पती डॉ. सी. पी. सावंत हेदेखील ...

वंदनाताई यांना माहेरूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील लामकाणीचे माजी उपसरपंच होते. पती डॉ. सी. पी. सावंत हेदेखील यापूर्वी तिलालीचे ग्रामपंचायत सदस्य होते. शालेय शिक्षण समिती, तंटामुक्त समिती यांसह गावातील विविध समित्यांवर काम करून डॉ. सी. पी. सावंत यांनी आपले काम सुरू ठेवले. नोकरीनिमित्ताने ते नंदुरबारात स्थायिक असले तरी त्यांनी आपल्या गावाशी नाळ तोडली नाही. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी पीएच. डी. मिळविली. महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर तेे पदाधिकारी म्हणून राहिले. एनमुक्टोसारख्या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले. आता ते अक्कलकुवा विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज पीएच.डी. झाले असून अनेक उच्चपदावर कार्यरत आहेत. चतुर सर व वंदनाताई यांनी नेहमीच समाजसेवेला प्राधान्य दिले आहे. गावातील कुठल्याही व्यक्तीचे कुठलेही काम राहिले आणि तो व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्याला ते कधीच नाराज करणार नाही. काम होत नसेल तर किमान दिलासा व धीर तरी देतील. गावातील गणेशोत्सव असो, कानुमाता उत्सव असो किंवा इतर कुठलाही धार्मिक कार्यक्रम असतो; त्यात या दाम्पत्याचे सक्रिय योगदान असतेच. गावातील कानुबाई मंदिरातील मूर्तीसाठी त्यांनी ४१ हजार रुपयांची देणगी दिली. सदस्य व सरपंचपदीदेखील बिनविरोध विराजमान झाल्या. हे शक्य झाले ते केवळ त्यांच्या सामाजिक दातृत्व व कर्तृत्वामुळेच. यासाठी माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक संतोषआबा पाटील यांचे मोठे सहकार्य व योगदान राहिले.

केवळ पद घेऊन ते मिरवून घेणे सावंत दाम्पत्याला कधीही आवडले नाही. त्यामुळे सरपंचपद मिळताच आधी त्यांनी गावात कुठल्या कामांची आवश्यकता आहे; कुठल्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे यासाठी त्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन ते समजून घेतले. त्यानुसार कामाला सुरुवात केली. याच काळात कोरोनाची साथ जोमात होती. त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे आणि कमीत कमी त्याचा गावात फैलाव होणे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. स्वखर्चाने संपूर्ण गावात त्यांनी फवारणी केली. स्वखर्चानेच प्रत्येक कुटुंबाला मास्क, सॅनिटायझर वाटप केले. गावात विनाकारण फिरणे, गर्दी करून बसणे, सार्वजनिक कार्यक्रम यांवर निर्बंध घालून कडक उपाययोजना दंडदेखील केले. त्यामुळे कोरोनाच्या साथीचा गावात फारसा शिरकाव झाला नाही. ग्रामस्थांची साथ आणि सरपंच यांचे योग्य नियोजन यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. गावात सध्या भूमिगत गटारींच्या कामांना सुरुवात झाली आहे. लवकरच अंतर्गत रस्तेकाम, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, महिला शौचालय यांसह गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. दिव्यांगांसाठीचा त्यांचा हक्काचा निधी त्यांना मिळावा यासाठी दिव्यांगांना चेकद्वारे त्यांच्या हक्काची रक्कम देणारी तिलाली ही नंदुरबार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. याशिवाय गावातील पात्र लाभार्थी व्यक्तींना निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वत: सरपंच वंदनाताई या प्रयत्नशील असतात. काहींना योजनेची माहिती नाही; परंतु पात्र आहेत अशा अनेकांचे कागदपत्र तयार करून त्यांची फाईल करून प्रकरण संबंधित कार्यालयात जमा करण्यास त्यांचे प्राधान्य असते.

या सर्व कामांमध्ये त्यांचे पुत्र चि. कल्पेश याचादेखील सिंहाचा वाटा आहे. आपले शिक्षण पूर्ण करताना तोदेखील ग्रामविकासात आता सक्रिय झाला आहे. आईसोबत तो ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतो. गावातील युवकांचे संघटन करून त्या माध्यमातून विविध विधायक कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या गावातील विकासकामांवर देखील तो लक्ष देऊन असतो. या माध्यमातून तो सामाजिक कार्यात सक्रिय झाला आहे.

गावविकासासंदर्भात बोलताना वंदनाताई सांगतात, माहेर आणि सासरकडून समाजसेवेचा वारसा मिळाला आहे. पती गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत सक्रिय आहेत. त्यांच्या समाजसेवेची तळमळ मी पाहत असते. त्यांच्याकडून मला कामांची प्रेरणा मिळत असून माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी, रामभैय्या रघुवंशी व संतोष आबा पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. गावाची सेवा करण्याची मिळालेल्या या संधीचे आपण नक्कीच सोने करणार, असेही सरपंच वंदनाताई यांनी सांगितले.

कामांचा धडाकेबाज प्रारंभ...

गावातील विविध विकासकामांचा धडाकेबाज प्रारंभ करण्यात आला आहे. ४४ लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते संतोषआबा पाटील, सरपंच वंदनाताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी विजेचे पोल बसविण्यात येणार असून जास्त क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मरही लवकरच मंजूर करून बसविले जाणार आहे.

आरोग्य व स्वच्छतेवर भर

ग्रामस्थांच्या आरोग्य व स्वच्छतेवर सर्वाधिक भर देण्याचा प्रयत्न सरपंच वंदना सावंत यांचा आहे. त्याच अनुषंगाने गावात महिलांचे आरोग्य व त्यांच्या समस्या यावर त्या भर देत आहेत. शुद्ध पाण्यासाठी १० लाख रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविण्यात येत आहे. १० लाख रुपये खर्च करून महिला शौचालय बांधले जात आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्यात येत आहे. गावात जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या जाणार आहेत. बंदिस्त गटारी तयार करण्यात येत असून धोबीघाटाचाही प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सरपंच वंदनाताई सावंत यांनी सांगितले. आपण स्वत: महिला असल्याने महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर आपला सर्वाधिक भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.