शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसचा डोस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख लसी देण्यात आल्या आहेत. या लसींचा पुरवठा नियमित असल्याने ...

नंदुरबार : जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख लसी देण्यात आल्या आहेत. या लसींचा पुरवठा नियमित असल्याने जिल्ह्यात लसीकरण सुरळीत झाले असून प्राप्त झालेल्या व्हायलमधून एकही डोस आजवर वाया गेलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात १२ हजार २७३ आरोग्य कर्मचारी, १० हजार ५३६ फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ ते ६० पेक्षा अधिक वय असलेले ६ लाख ३३८ आणि १८ ते ४४ वयोगटातील आठ लाख ३४ हजार ९० अशा एकूण १४ लाख ५८ हजार जणांना नजरेसमाेर ठेवत लसीकरण सुरु करण्यात आले होते. यात सर्वात प्रथम आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. आरोग्य विभागात काम करणा-या सर्व कर्मचा-यांच्या नोंदण्या करुन लसीकरण सुरु करण्यात आले होते. प्रारंभी लसीकरणाचा कमी असलेला वेग दुपटीने वाढून त्यात आणखी इतर संवर्गातील आरोग्य कर्मचारी समाविष्ट होवून ही संख्या १३ हजार ३७१ झाली होती. या सर्वांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण थांबवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. यातून आरोग्य फ्रंटलाईन कर्मचा-यांना दुसरा तर ज्येष्ठांना पहिला आणि दुसरा डोस देण्यास गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात साधारण ५० हजाराच्या जवळपास कोविशिल्डचे डोस शिल्लक असल्याने सर्व ४४ केंद्रांवर लसीकरण सुरळीत सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करुन नोंदणी करणा-यांना लस देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकही डोस वाया जात नाही..

जिल्ह्यात जानेवारी मध्यात सुरु झालेल्या लसीकरणात आजवर एकही डोस वाया गेला नसल्याचे सांगण्यात आले. एका व्हायलमध्ये १० डोस तयार करता येतात. परंतू जिल्ह्यातील कर्मचारी काटकसर करत एका डोसमधून १२ लसी तयार करतात.

साधारण दोन लसी ह्या वाढीवच असल्याने त्यांचा वापर होतो. प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी नोंदणी होत असल्याने लस वाया जातच नाहीत. कधीकधी व्हायल संपल्यावरही नागरीक केंद्रात असतात.

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ५ वाजेपासून रांगा

nसातपुड्याच्या दुर्गम भागातील दोन तालुक्यांसह सपाटीच्या चार तालुक्यात निर्माण केलेल्या केंद्रांवर पहाटे पाच वाजेपासून नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे. मात्र नोंदणी करण्यात अडचण येत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. नोंदणी करण्याबाबत नागरिकांची समजूत घालताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होते आहे.

जिल्ह्यातील ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या १ लाख १२ हजार ४३६ नागरीकांना लसीचा पहिला डाेस पूर्ण झाला आहे. एकूण ४.१९ टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

nआरोग्य विभागाकडून सहा तालुक्यातील ४४ व त्यापुढील वर्गासाठी केलेल्या सर्वेक्षणात एकूण ६ लाख नागरीक असल्याचे समोर आले होते. या सर्वांना लस दिली जाणार आहे.