शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नंदुरबारात वनपट्टे धारकांचा हळद लागवडीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:34 IST

लोकसमन्वयचा पुढाकार : जिल्हाधिका:यांच्या हस्ते शुभारंभ, शेतक:यांमध्ये कुतूहल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनपट्टे धारक व स.स.प्र. बधितांच्या शेतीत ठिबक आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. साधारणत: 50 एकरवर ठिबकच्या आधारावर लागवड करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील आमली या गावातील वनपट्टे धारक मिठय़ा नाईक व प्रकाश नाईक या शेतक:यांच्या शेतात जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या हस्ते सिंचन आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ झाला. वनपट्टे धारकांना पीककर्ज उपलब्ध होणे व आधुनिक तंत्रज्ञानासाठी कर्ज व कृषी विभागाकडून अनुदान उपलब्ध होणे ही जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताई जैन मल्टिपर्पज फौंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 50 शेतक:यांच्या शेतात हळद व 50 शेतक:यांच्या शेतात आंबा असे 100 शेतक:यांच्या शेतात ठिबक सिंचन आधारित हळद लागवड व आबा लागवडीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पीक कर्ज अर्थसहाय्य रुपात स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी उपलबद्ध करून दिले आहे.  जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, प्रकाश नाईक यांनी लोकसमन्वयच्या साह्याने मागील वर्षी नरेगा मधून विहीर घेतली व ती पूर्ण करत ह्या वर्षी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत ही बाब अतिशय भूषणावह आहे. जिल्ह्यातील सरदार सरोवर विस्थापित हातात हात घालून आधुनिक तंत्रज्ञान वापरत आपला विकास घडवत आहेत त्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीर उभे आहे. सर्व प्रकारची मदत करावयास कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी बोलताना दिली.एका बाजूला लोकसंघर्ष मोर्चाचा वनपट्टे अधिकाराचा लढा सुरूच आहे तर दुस:या बाजूला वनपट्टे मिळालेल्या दावेदारांच्या शेतात शासनाच्या योजना, पीककर्ज व आधुनिक शेतीसाठी अनुदान पोहचवणारा नंदुरबार पहिला जिल्हा ठरला आहे. त्याबाबत लोकसमन्वयचे संजय महाजन व सचिन धांडे, लोकसंघर्ष मोर्चाचे काथा वसावे यांनी शासनाचे आभार मानले.यावेळी जैन इरिगेशनचे बाळकृष्ण ब:हाटे, गोविंद पाटील, अमित ढमढेरे, स्टेटबँकेचे वानखेडे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख, लोकसमन्वयचे निशांत मगरे, देविदास वसावे, दीपाली पाटील, देवमोगरा पुनर्वसनचे सरपंच नरपत पाडवी, आमलीचे सरपंच भगतसिंग नाईक व शेकडो शेतकरी उपस्थित होते.