शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दुकानांमधील युरिया संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सध्या खतटंचाई असल्याचे समोर आले असून यात प्रामुख्याने बाजारात युरियाच नसल्याचे दिसून आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सध्या खतटंचाई असल्याचे समोर आले असून यात प्रामुख्याने बाजारात युरियाच नसल्याचे दिसून आले आह़े़ ‘लोकमत’ने याबाबत दुकानांमध्ये तपासणी केली असता, कृषी सेवा केंद्र चालक युरियाच नसल्याचे सांगून हातवर करत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांची फरफट सुरु झाली असून सकाळी शहरात येणारा शेतकरी रिकाम्या हाताने परत जात आहे़कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख १८ हजार १६० मे. टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने केली होती़ यातून ९८ हजार मेट्रीक टन खताला मंजूरी होती़ पैकी २४ हजार ६६० मेट्रीक टन खत पाठवण्यात आले होते़ यात १८ हजार मेट्रीक टन युरिया होता़ परंतु आता हा युरिया ‘संपला’ असल्याचे सांगण्यात येत आहे़ सोमवारपर्यंत मिश्र खते घेणार तरच युरिया देणार अशी भूमिका घेणारे खतविक्रेते मंगळवारी खतच नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत़ गोडावून आणि दुकानांमध्ये केवळ मिश्र खते पडून असल्याचे सांगून शेतकºयांना परत पाठवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत़‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील बाजार समिती परिसर, हाटदरवाजा आणि अंधारे चौक परिसरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये चौकशी केली असता, युरियाच नसल्याचे सांगून परत पाठवण्यात आले़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून मंगळवारी खतांच्या खरेदीसाठी आलेले शेतकरी निराश परतल्याचे चित्र दिसून आले़ येत्या काळात पिकांना युरियाची गरज आहे़ मात्र युरिया कधी येणार हे सांगितले जात नसल्याने चिंता वाढल्या आहेत़शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खते आणि बियाणे विक्रेत्यांची दुकाने सर्वाधिक आहेत़ या ठिकाणी सर्व दुकानांवर चौकशी केली असता, कोठेही युरिया उपलब्ध नाही़ मात्र डीएपी, एमओपी, पोटॅश, एसएसपी आदी सर्व प्रकारची मिश्र खते पडून असल्याची माहिती देण्यात आली़ रॅकच लागला नसल्याने युरिया आलेला नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़ दरम्यान गोडावूनमध्ये खते आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर ‘नाही’ असेच उत्तर देण्यात आले़ शहरातील बहुतांश विक्रेत्यांचे गोडावून हे अडगळीच्या ठिकाणी आहेत़ या गोडावूनची माहिती कृषी विभागाला देण्याची आवश्यकता आहे़ कृषी विभागाची भरारी पथके गोडावूनची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी नंदुरबार शहरात मात्र मंगळवारी कोणत्याही प्रकारची तपासणी झालेली नाही़जिल्ह्यात १८ हजार २१ मेट्रीक टन युरिया खरीप हंगामासाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता़ सर्वसाधारण जिल्ह्यात ७० मेट्रीक टन युरियाची आवश्यकता आहे़ याउलट उपलब्ध साठा हा केवळ २० टक्के होता़ यामुळे सध्या बाजारात युरियाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे़ सध्या विक्रेत्यांकडे २ हजार ५१४ मेट्रीक टन डीएपी, १ हजार ८१९ मेट्रीक टन एमओपी, १३ हजार ९७ मेट्रीक टन एसएसपी तर १२ हजार ७९३ मेट्रीक टन मिश्र खते उपलब्ध असल्याची माहिती दिली गेली आहे़कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार देशात ५० टक्के युरिया आयात केला जातो़ परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ही आयात बंद झाली आहे़ यातून देशभर युरिया टंचाई असल्याचा दावा केला जात आहे़जिल्ह्यात १ लाख १८ हजार मेट्रीक टन खतापैकी ९८ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाल्यानंतर ते तातडीने प्राप्त होण्याची अपेक्षा होती़ परंतु जिल्ह्यात केवळ ३३ हजार ५१० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला आहे़ गेल्यावर्षीचा १७ हजार ८४५ मेट्रीक टन खत साठा मिळून केवळ ५१ हजार ३५५ मेट्रीक टन खतेच शेतकºयांना देण्यात आलेला असल्याने समस्या वाढल्या आहेत़