शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

जयनगरसह परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही ...

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तेव्हाही गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी फवारणी करूनही पिके पूर्वपदावर आणली होती. मात्र आता परत ढगाळ वातावरणासोबत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू असून, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केळीबाग तयार झाली आहे त्या शेतकऱ्यांचा बराचसा माल व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिल्यामुळे परिपक्व झालेले घड रात्रभरच्या पावसामुळे गळून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गहू पेरणी केली आहे त्या गव्हाला फुटकी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. जयनगरसह अनेक शेतकरी सध्या कांदा लागवड करीत असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोठली गावात तीन-चार शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली असून अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.