शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जयनगरसह परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही ...

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तेव्हाही गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी फवारणी करूनही पिके पूर्वपदावर आणली होती. मात्र आता परत ढगाळ वातावरणासोबत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू असून, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केळीबाग तयार झाली आहे त्या शेतकऱ्यांचा बराचसा माल व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिल्यामुळे परिपक्व झालेले घड रात्रभरच्या पावसामुळे गळून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गहू पेरणी केली आहे त्या गव्हाला फुटकी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. जयनगरसह अनेक शेतकरी सध्या कांदा लागवड करीत असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोठली गावात तीन-चार शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली असून अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.