शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अतिदुर्गम भागात ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून ...

नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून सुरू झालेला ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा प्रयोग यशस्वी झाला असून त्यातून १०० शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. या प्रयोगांतर्गत पाच गुंठे जागेत एक आगळ्या पद्धतीने सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती ही शेतीसाठी प्रतिकूल आहे. डोंगर-उताराची जमीन त्यातच सिंचनाचा अभावामुळे या भागातील आदिवासींकडे पारंपरिक शेती असली तरी त्यांच्यासाठी समृद्धीचा मार्ग फार लांब राहिला आहे. या आदिवासींना मुख्य प्रवाहाशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तेथील शेती समृद्ध करून आदिवासी उत्थानासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशनअंतर्गत ग्रामसमृद्धी प्रकल्पातून बायफ संस्थेच्या संयोजनाने राबविण्यात येणारा ‘ट्रेलिस बेस व्हेजिटेबल्स ॲण्ड टँक नी ड्रीप सिस्टिम’ अंतर्गत १०० शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात १६ गावांची निवड करून तेथील १०० शेतकरी निवडण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांकडे असलेल्या पाच गुंठे जागेत वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी मंडप तयार करण्यात आला आहे. तेथे ‘सातपुडा पॅटर्न’ची अनोखी सिंचन व्यवस्था पहायला मिळते. त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर एक हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीतून ड्रीप करण्यात आले आहे. साध्या नळ्या लावून आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून ही ड्रीप करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीत संबंधित शेतकरी जवळपासच्या ठिकाणाहून पाणी आणून ती भरतात. बहुतांश शेतकरी गाढवावरून पाणी वाहून टाकीत भरतात. या पाण्याच्या टाकीतून ड्रीपद्वारे लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला ते पाणी देतात.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी गिलकी, कारले आणि दुधीभोपळ्याची लागवड केली आहे. ही योजना बायफच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी राबवीत आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला साधारणत: ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मंडपात संबंधित शेतकरी १० वर्षांपर्यंत भाजीपाल्याचे पीक घेऊ शकणार आहेत.

निवड झालेली गावे

या प्रकल्पाअंतर्गत धडगाव तालुक्यातील काकर्दा, चोंदवाडे, धमाके, हरणखुरी, शेलकुई, खरवड, उमराणी, बिहरी तर अक्कलकुवा तालुक्यातील काठी, भगदरी, बेडाकुंड, जमाना, वेली, बिजरीगव्हाण, बर्डी, भांग्रापाणी या गावांची निवड करण्यात आली असून या गावांमधील १०० शेतकरी ही योजना राबवीत आहेत.

ही योजना चांगली असून त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. जानेवारी महिन्यात आम्ही भाजीपाल्याची लागवड केली होती. आता त्याचे उत्पन्न सुरू झाले असून लॉकडाऊनमुळे याच भागात रस्त्यावर बसून भाजीपाला विकला जात आहे. आपल्याला सुमारे २५ हजारांचे उत्पन्न मिळाले. पुन्हा ऑगस्टमध्ये लागवड करणार आहोत.

-तिरसिंग इजमल पावरा, चोंदवाडे, ता.धडगाव