शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

10 कोटींचा खर्च करुन अडीच हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:42 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

नंदुरबार : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात 2 हजार 497 हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली गेली आह़े यात, साधारणत 10 कोटी 23 लाख इतका पैसा खर्च झाला असला तरी, त्या तुलनेत केवळ अडीच हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली आली असल्याची चर्चा आह़े दोन वर्षात 1 हजार 723 लाभाथ्र्याना योजनेचा लाभ मिळाला आह़े सुरुवातील सुक्ष्म सिंचन योजना व 2015-2016 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे नामांतर झालेल्या या योजनेव्दारे जास्तीत जास्त जमिन सिंचनाखाली यावी असा शासनाचा मानस होता़ योजनेअंतर्गत 60 टक्के खर्चाचा वाटा हा केंद्र शासनाचा तर 40 टक्के वाटा हा राज्य शासनाला उचलावा लागत असतो़ 2016-2017 या वर्षात एकूण 1 हजार 157 लाभाथ्र्यानी योजनेचा लाभ घेतला़ त्यात, ठिबक सिंचनसाठी 1 हजार 41 तर, तुषार सिंचनासाठी 116 लाभार्थी पात्र ठरले होत़े दरम्यान अक्कलकुवा 14, धडगाव 3 या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक कमी लाभाथ्र्याची संख्या राहिली़ लाभाथ्र्याना ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आल़े 2016-2017 मध्ये ठिबक सिंचनाखाली 1 हजार 522 तर तुषार सिंचनाखाली 145 हेक्टर असे  एकूण 1 हजार 668 हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्यात आली़ यात, ठिबकसाठी 5 कोटी 92 लाख तर तुषार सिंचनासाठी 42 लाख असा साधारणत 6 कोटी 35 लाख रुपयांचा निधी ‘डीबीटी’व्दारे लाभाथ्र्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आह़े लाभाथ्र्याची होतेय शोधाशोधअक्कलकुवा, धडगाव आदी तालुक्यांमध्ये कृषी विभागाला लाभाथ्र्याची शोधाशोध करावी लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ 2017-2018 मध्ये एकूण 572 लाभाथ्र्याना सिंचनाचा लाभ मिळाला आह़े धडगाव तालुक्याचा विचार करता ठिबक सिंचनासाठी केवळ एका लाभाथ्र्याचा प्रस्ताव आला आह़े तर, तुषार सिंचनासाठी अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार, नवापूर या तालुक्यांमधून एकही लाभार्थी मिळाला नसल्याची माहिती मिळाली़ तसेच इतर तालुक्यातसुध्दा लाभाथ्र्याची वाणवा असल्याचेच दिसून येत आह़े दरम्यान, आतार्पयत या वर्षात एकूण 829 हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्यात आली़ अजून याहून अधिक जमिन सिंचनाखाली आणायचे लक्ष कृषी विभागासमोर कायम आह़े आतार्पयत सिंचनासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े दुर्गम भागात शासकीय योजनांच्या लाभाबाबत ब:यापैकी उदासिनता दिसून येत असत़े त्यामुळे यामुळे साहजिकच योजनांसाठी कृषी विभागाला मोठी कसरत करावी लागत असत़े बागायतदार क्षेत्रांसाठी सिंचन योजनांचा मोठय़ा प्रमाणावर लाभ घेण्यात येत असतो़ अक्कलकुवा, धडगाव, आदी परिसरात काही प्रमाणात बागायती क्षेत्र असले तरी, त्या ठिकाणी लाभाथ्र्याची संख्या ही नगण्य असल्याचे दिसून येत आह़े प्रस्तावांवर त्वरीत कार्यवाही व्हावीअनेक वेळा तालुकास्तरावर लाभाथ्र्याचे सिंचन प्रस्ताव धुळखात पडत असतात़ ते पुढील कार्यालयात पाठविण्यात येत नाहीत़ दिवसेंदिवस हे प्रस्ताव तालुका प्रशासनाकडेच पडत असतात़ त्यामुळे लाभाथ्र्याना सतत पाठपुरावा करुन आपले प्रस्ताव निकाली काढण्याबाबत कसरत करावी लागत असत़े त्यामुळे संबंधित तालुका प्रशासनाने कार्यालयात  आलेल्या प्रस्तावांवर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी लाभाथ्र्याकडून करण्यात येत असत़े तसेच प्रस्तावांमधील तृटीही त्वरीत दुर करण्याची मागणी होत आह़े