शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

प्रलंबित वनहक्कासाठी ‘उलगुलान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले जावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आवारात प्रवेश न दिल्याने कार्यालयाबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरुच ठेवले होते़लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, झिलाबाई वसावे, काथाभाऊ वसावे यांच्या मार्गदर्शनात शहरातील नेहरु चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता़ सुमारे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार २०१८-१९ या वर्षात पडलेला दुष्काळ, २०१९ मधील अतीवृष्टी, अवेळी पाऊस या मुळे नुकसानीची भरपाई पंचनाम्यांप्रमाणे देण्यात यावी, २०१९ मध्ये अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले होते़ यापार्श्वभूमीवर शासनाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अध्यादेश काढून भरपाई देण्याचे निश्चित केले होते़ परंतू यात वन जमीन धारक आणि प्रलंबित वनजमीन धारक यांचा उल्लेख राहून गेल्याने १० फेब्रुवारी रोजी महसूल व वनविभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार वन जमीन धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, २०१८ मध्ये झालेल्या मोर्चाच्यावेळी मान्य केलेल्या दावेदारांचे अपील स्विकारले होते त्यावर अद्याप सुनवाई झालेली नाही ती तात्काळ करुन लोकांना न्याय द्यावा, अक्कलकुवा तळोदा व धडगाव ताुलक्यातील वनजमीन धारकांची १२ अ ची चौकशी व जीपीएस झालेले नाही ते तात्काळ करण्यात यावे, वनपट्टे धारकांना अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर, कोलवीमाळ, व खाई ह्या गावांना दिल्याप्रमाणे सातबारे देण्यात यावेत, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दावे उपविभागीय समितीकडून गहाळ झाले असून ते दावे पुर्ननिर्माणाची जबाबदारी तळोदा उपविभागीय समितीने घेतली आहे ती तात्काळ पूर्ण करावी, सर्व वनपट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध देण्यासह जमीन व उपजिविका सुधारणासंदर्भात विशेष योजना राबवण्यात याव्यात, सामुदायिक वन हक्काची जनपक्षीय अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासह विविध मागण्या आहेत़निवेदनावर रमेश नाईक, जगन वळवी, बटेसिंग वळवी, रायसिंग वसावे, सायसिंग वसावे, भानुदास वळवी, धिरसिंग वसावे, चंपालाल नाईक, डिगंबर खर्डे, नटवर मोरे, दिलीप वळवी, मुकेश वळवी, नारु पाडवी, खेमजी गोवल्या वसावे, देविदास वळवी आदींच्या सह्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले जावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आवारात प्रवेश न दिल्याने कार्यालयाबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरुच ठेवले होते़लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, झिलाबाई वसावे, काथाभाऊ वसावे यांच्या मार्गदर्शनात शहरातील नेहरु चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता़ सुमारे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार २०१८-१९ या वर्षात पडलेला दुष्काळ, २०१९ मधील अतीवृष्टी, अवेळी पाऊस या मुळे नुकसानीची भरपाई पंचनाम्यांप्रमाणे देण्यात यावी, २०१९ मध्ये अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले होते़ यापार्श्वभूमीवर शासनाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अध्यादेश काढून भरपाई देण्याचे निश्चित केले होते़ परंतू यात वन जमीन धारक आणि प्रलंबित वनजमीन धारक यांचा उल्लेख राहून गेल्याने १० फेब्रुवारी रोजी महसूल व वनविभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार वन जमीन धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, २०१८ मध्ये झालेल्या मोर्चाच्यावेळी मान्य केलेल्या दावेदारांचे अपील स्विकारले होते त्यावर अद्याप सुनवाई झालेली नाही ती तात्काळ करुन लोकांना न्याय द्यावा, अक्कलकुवा तळोदा व धडगाव ताुलक्यातील वनजमीन धारकांची १२ अ ची चौकशी व जीपीएस झालेले नाही ते तात्काळ करण्यात यावे, वनपट्टे धारकांना अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर, कोलवीमाळ, व खाई ह्या गावांना दिल्याप्रमाणे सातबारे देण्यात यावेत, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दावे उपविभागीय समितीकडून गहाळ झाले असून ते दावे पुर्ननिर्माणाची जबाबदारी तळोदा उपविभागीय समितीने घेतली आहे ती तात्काळ पूर्ण करावी, सर्व वनपट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध देण्यासह जमीन व उपजिविका सुधारणासंदर्भात विशेष योजना राबवण्यात याव्यात, सामुदायिक वन हक्काची जनपक्षीय अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासह विविध मागण्या आहेत़निवेदनावर रमेश नाईक, जगन वळवी, बटेसिंग वळवी, रायसिंग वसावे, सायसिंग वसावे, भानुदास वळवी, धिरसिंग वसावे, चंपालाल नाईक, डिगंबर खर्डे, नटवर मोरे, दिलीप वळवी, मुकेश वळवी, नारु पाडवी, खेमजी गोवल्या वसावे, देविदास वळवी आदींच्या सह्या आहेत़