शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

प्रलंबित वनहक्कासाठी ‘उलगुलान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले जावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आवारात प्रवेश न दिल्याने कार्यालयाबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरुच ठेवले होते़लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, झिलाबाई वसावे, काथाभाऊ वसावे यांच्या मार्गदर्शनात शहरातील नेहरु चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता़ सुमारे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार २०१८-१९ या वर्षात पडलेला दुष्काळ, २०१९ मधील अतीवृष्टी, अवेळी पाऊस या मुळे नुकसानीची भरपाई पंचनाम्यांप्रमाणे देण्यात यावी, २०१९ मध्ये अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले होते़ यापार्श्वभूमीवर शासनाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अध्यादेश काढून भरपाई देण्याचे निश्चित केले होते़ परंतू यात वन जमीन धारक आणि प्रलंबित वनजमीन धारक यांचा उल्लेख राहून गेल्याने १० फेब्रुवारी रोजी महसूल व वनविभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार वन जमीन धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, २०१८ मध्ये झालेल्या मोर्चाच्यावेळी मान्य केलेल्या दावेदारांचे अपील स्विकारले होते त्यावर अद्याप सुनवाई झालेली नाही ती तात्काळ करुन लोकांना न्याय द्यावा, अक्कलकुवा तळोदा व धडगाव ताुलक्यातील वनजमीन धारकांची १२ अ ची चौकशी व जीपीएस झालेले नाही ते तात्काळ करण्यात यावे, वनपट्टे धारकांना अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर, कोलवीमाळ, व खाई ह्या गावांना दिल्याप्रमाणे सातबारे देण्यात यावेत, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दावे उपविभागीय समितीकडून गहाळ झाले असून ते दावे पुर्ननिर्माणाची जबाबदारी तळोदा उपविभागीय समितीने घेतली आहे ती तात्काळ पूर्ण करावी, सर्व वनपट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध देण्यासह जमीन व उपजिविका सुधारणासंदर्भात विशेष योजना राबवण्यात याव्यात, सामुदायिक वन हक्काची जनपक्षीय अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासह विविध मागण्या आहेत़निवेदनावर रमेश नाईक, जगन वळवी, बटेसिंग वळवी, रायसिंग वसावे, सायसिंग वसावे, भानुदास वळवी, धिरसिंग वसावे, चंपालाल नाईक, डिगंबर खर्डे, नटवर मोरे, दिलीप वळवी, मुकेश वळवी, नारु पाडवी, खेमजी गोवल्या वसावे, देविदास वळवी आदींच्या सह्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले जावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आवारात प्रवेश न दिल्याने कार्यालयाबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरुच ठेवले होते़लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, झिलाबाई वसावे, काथाभाऊ वसावे यांच्या मार्गदर्शनात शहरातील नेहरु चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता़ सुमारे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार २०१८-१९ या वर्षात पडलेला दुष्काळ, २०१९ मधील अतीवृष्टी, अवेळी पाऊस या मुळे नुकसानीची भरपाई पंचनाम्यांप्रमाणे देण्यात यावी, २०१९ मध्ये अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले होते़ यापार्श्वभूमीवर शासनाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अध्यादेश काढून भरपाई देण्याचे निश्चित केले होते़ परंतू यात वन जमीन धारक आणि प्रलंबित वनजमीन धारक यांचा उल्लेख राहून गेल्याने १० फेब्रुवारी रोजी महसूल व वनविभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार वन जमीन धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, २०१८ मध्ये झालेल्या मोर्चाच्यावेळी मान्य केलेल्या दावेदारांचे अपील स्विकारले होते त्यावर अद्याप सुनवाई झालेली नाही ती तात्काळ करुन लोकांना न्याय द्यावा, अक्कलकुवा तळोदा व धडगाव ताुलक्यातील वनजमीन धारकांची १२ अ ची चौकशी व जीपीएस झालेले नाही ते तात्काळ करण्यात यावे, वनपट्टे धारकांना अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर, कोलवीमाळ, व खाई ह्या गावांना दिल्याप्रमाणे सातबारे देण्यात यावेत, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दावे उपविभागीय समितीकडून गहाळ झाले असून ते दावे पुर्ननिर्माणाची जबाबदारी तळोदा उपविभागीय समितीने घेतली आहे ती तात्काळ पूर्ण करावी, सर्व वनपट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध देण्यासह जमीन व उपजिविका सुधारणासंदर्भात विशेष योजना राबवण्यात याव्यात, सामुदायिक वन हक्काची जनपक्षीय अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासह विविध मागण्या आहेत़निवेदनावर रमेश नाईक, जगन वळवी, बटेसिंग वळवी, रायसिंग वसावे, सायसिंग वसावे, भानुदास वळवी, धिरसिंग वसावे, चंपालाल नाईक, डिगंबर खर्डे, नटवर मोरे, दिलीप वळवी, मुकेश वळवी, नारु पाडवी, खेमजी गोवल्या वसावे, देविदास वळवी आदींच्या सह्या आहेत़