शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

By admin | Updated: March 27, 2017 00:09 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिखाऊपणा : तिन्ही चौफुलींवरील स्थिती

नंदुरबार : दोन आठवड्यांपूर्वी वाघेश्वरी चौफुलीवरील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. दर दोन वर्षांनी असे प्रकार सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा नाकर्तेपणा की, अतिक्रमणधारकांची मुजोरी? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच स्थिती कोरीट चौफुली व नवापूर रोड चौफुलीवरील आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या भागात अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाघेश्वरी चौफुलीवर साक्री, नवापूर, धुळे तसेच वळण रस्ते येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटले आहेत. परिणामी चौफुलीवर वर्दळ वाढली आहे. त्याचा परिणाम अपघात वाढण्यात झाला आहे. हा परिसर व येथे येणारे सर्व रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची निगा राखणे, डागडुजी करणे, ठरावीक काळानंतर नवीन रस्ते तयार करणे, अशी कामे करावी लागतात. शिवाय अतिक्रमण वाढले असल्यास ते लागलीच काढण्याची मुभादेखील या विभागाला असते. वाघेश्वरी चौफुलीच्या चारही बाजूंनी असलेले अतिक्रमण दोन आठवड्यांपूर्वी बांधकाम विभागाने काढले होते. जवळपास ३० ते ४० कच्ची अतिक्रमणे नेस्तानुभूत करण्यात आली होती. काहींनी स्वत:हून टपरी, लहान दुकाने, हातगाडीवरील दुकान काढून घेतले होते. त्यामुळे हा परिसर विस्तृत व मोकळा झाला होता. परिणामी वाहनांना उभे राहण्यास जागा तसेच प्रवाशांनादेखील ते सोयीचे झाले होते. अतिक्रमण काढल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. शिवाय पुन्हा अतिक्रमण होणार     नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.पुन्हा जैसे थे...अतिक्रमण काढलेल्या जागी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या जागेवर जी टपरी, दुकान होते, ते पुन्हा ठेवण्यात आले आहे. याशिवाय मांस विक्रेत्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे प्रयोजन काय होते, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चौफुलीच्या चारही भागांत ३० ते ४० जणांनी दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ, गतिरोधकाचा अभाव यामुळे अपघातदेखील वाढले आहेत. वाहतूक पोलिसांनाही ताणया ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येते. परंतु चारही बाजूंनी अतिक्रमणामुळे त्यांनाही रहदारी नियमन करताना ताण सहन करावा लागतो.