शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नंदुरबार जिल्ह्यात दर तिघांमागे दोनजण तंबाखू खाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तंबाखू व तंबाखू मिश्रीत गुटखा खाण्यामुळे मुखाच्या कर्करोगास सामोरे जावे लागत असले तरी ते खाणा:यांची संख्या काही कमी झालेली नाही.  जिल्ह्यात झालेल्या सव्र्हेक्षणात दर तीन लोकांमध्ये दोन लोकं तंबाखू सेवन करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी जागतिक मौखिक आरोग्य दिवस असून त्यानिमित्त जनजागृतीही होत आहे. तंबाखूची सवय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तंबाखू व तंबाखू मिश्रीत गुटखा खाण्यामुळे मुखाच्या कर्करोगास सामोरे जावे लागत असले तरी ते खाणा:यांची संख्या काही कमी झालेली नाही.  जिल्ह्यात झालेल्या सव्र्हेक्षणात दर तीन लोकांमध्ये दोन लोकं तंबाखू सेवन करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी जागतिक मौखिक आरोग्य दिवस असून त्यानिमित्त जनजागृतीही होत आहे. तंबाखूची सवय ही समाजाच्या आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट आहे. तंबाखूच्या जागतिक साथीमुळे दरवर्षी सहा मिलियन लोकांचा मृत्यू होतो. त्यातले सहा लाख लोक हे तंबाखू न खाणारे किंवा धुम्रपानन करणारे असून दुस:यांनी सोडलेला धूर श्वसनाद्वारे घेतल्याने मृत्यू पावतात. म्हणजे स्वत:चा काहीही दोष नसतांना हे लोक अकारण बळी पडतात. साधारणत: सहा सेकंदाला एक मृत्यू तंबाखुमुळे होत असतो. ही बाब लक्षात घेता दरवर्षी 5 फेब्रुवारी हा मौखिक आरोग्य दिन पाळला जातो.राज्यात झालेल्या विविध सर्वेक्षणाची आकडेवारी पाहता राष्ट्रीय कौटूंबिक आरोग्य पहाणीमध्ये सर्व प्रकारच्या तंबाखूचे प्रमाण मोठय़ा लोकांमध्ये 25 टक्के आहे. 2012-13 मध्ये जिल्हास्तरीय घरोघरी व संस्थाच्या केलेल्या सव्रेक्षणात राज्याचे प्रमाण 50 टक्के पेक्षा जास्त दिसते. जिल्ह्यात 65 टक्के पेक्षा जास्त प्रमाण म्हणजे दर तीन मोठय़ा लोकातील दोन किंवा जास्त लोक तंबाखू वापरतात असे दिसते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मुंबई येथील सलाम फाऊंडेशनच्या माध्यमातून हे अभियान सुरू आहे. याअंतर्गत शाळांना तंबाखूमुक्त शाळांचा पुरस्कारही दिला जातो. विशेष म्हणजे राज्यात तंबाखू युक्त गुटखा विक्रीवर बंदी असतांनाही नंदुरबार जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची विक्री होते. शेजारच्या गुजरात राज्यात गुटखाबंदी नसल्यामुळे तेथून मोठय़ा प्रमाणावर गुटखा आयात केला जातो. शहरातील अनेक पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा विक्री होतो. त्यामुळे शासनाच्या आदेशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. याबाबतही जनजागृती होऊन कारवाई होणे अपेक्षीत आहे.