शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

दोन वर्षानंतर पावणे दोन लाख क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ यंदा मिरचीचे दरांमध्ये तेजी कायम राहिल्याने तसेच निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांकडून मिरची आवक अद्यापही सुरु आहे़ अद्याप महिनाभर हंगाम सुरु राहणार असल्याने दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोन लाख क्विंटलचा टप्पा सहजरित्या पूर्ण होणार आहे़गेल्या पाच वर्षात वेळोवेळी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता़ यातून हंगामात किमान तीन लाख क्विंटलपर्यंत होणारी मिरची आवक गेल्या पाच वर्षात निम्म्यावर आली होती़ यातून बाजारातील अर्थकारण डळमळीत शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात उदासिनता निर्माण झाली होती़ परंतू गेल्या वर्षात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने दमदार हजेरी दिल्याने मिरची पिकाला जीवदान मिळाले होते़ परिणामी आतापर्यंत मिरची उत्पादन सुरु असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात असून यामुळे दर दिवशी नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात २ हजार २०० क्विंटलपर्यंत सरासरी मिरची आवक होत आहे़ हंगाम संपण्यास महिन्याचा कालावधी असल्याने ही आवक दोन लाख क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे़ मिरचीला मिळालेला बुस्टर इतर व्यवसायांवरही परिणामकारक ठरत असून पावडर तयार करण्यासह परराज्यात निर्यात होणाºया कोरड्या मिरचीलाही चालना मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे़यंदा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात राज्यातून मिरचीची आवक बाजारपेठेत होत असल्याने आतापर्यंत तब्बल ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती आहे़ आगामी काळातही व्यवहार सुरु राहणार असल्याने यंदाचा मिरची हंगाम ७५ ते ८० कोटींपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे़ यंदा येथील परराज्यातील मिरची आवक मर्यादित असल्याने स्थानिक शेतकºयांच्या मिरचीला प्राधान्य मिळाले आहे़२०१३-२०१४ या वर्षात नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८ हजार ४०३ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-२०१५ या वर्षात ९७ हजार ५६९ क्विंटल़२०१५-२०१६ या वर्षात ८९ हजार ८०९ क्विंटल़२०१६-२०१७ या वर्षात २ लाख ६८ हजार क्विंटल़२०१७-२०१८ या वर्षात ६६ हजार ५९४ क्विंटल़२०१८-२०१९ या वर्षात १ लाख ५६ हजार ९८९ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-१५, २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षात मिरची आवक ही एक लाख क्विंटलचा टप्पाही पूर्ण करु शकली नव्हती़ या वर्षात प्रामुख्याने दुष्काळी स्थिती असल्याने शेतकºयांना लागवडीची अडचण होती़ यात रोपांच्या किमतीत वाढ झाल्याने लागवड खर्च वाढला होता़ परिणामी लागवड क्षेत्र घटून उत्पादनातही मोठी घट आली होती़ यंदा मात्र मिरचीची लागवड अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक असल्याने उत्पन्न वाढले आहे़बाजारात ओल्या मिरचीचे दर हे प्रतिक्विंटल चार हजाराच्या पुढे असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ लाली, व्हीएनआर, शंकेश्वरी या मिरचीची सर्वाधिक खरेदी होत आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार हे बाजारासोबतच पथारींवर सुरु असल्याने तेथील मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील १५ गावांमधील महिला आणि पुरुष मजूरांना तब्बल चार महिन्यांपासून मिरची हंगामातून रोजगार मिळत आहे़