शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतर पावणे दोन लाख क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ यंदा मिरचीचे दरांमध्ये तेजी कायम राहिल्याने तसेच निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांकडून मिरची आवक अद्यापही सुरु आहे़ अद्याप महिनाभर हंगाम सुरु राहणार असल्याने दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोन लाख क्विंटलचा टप्पा सहजरित्या पूर्ण होणार आहे़गेल्या पाच वर्षात वेळोवेळी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता़ यातून हंगामात किमान तीन लाख क्विंटलपर्यंत होणारी मिरची आवक गेल्या पाच वर्षात निम्म्यावर आली होती़ यातून बाजारातील अर्थकारण डळमळीत शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात उदासिनता निर्माण झाली होती़ परंतू गेल्या वर्षात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने दमदार हजेरी दिल्याने मिरची पिकाला जीवदान मिळाले होते़ परिणामी आतापर्यंत मिरची उत्पादन सुरु असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात असून यामुळे दर दिवशी नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात २ हजार २०० क्विंटलपर्यंत सरासरी मिरची आवक होत आहे़ हंगाम संपण्यास महिन्याचा कालावधी असल्याने ही आवक दोन लाख क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे़ मिरचीला मिळालेला बुस्टर इतर व्यवसायांवरही परिणामकारक ठरत असून पावडर तयार करण्यासह परराज्यात निर्यात होणाºया कोरड्या मिरचीलाही चालना मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे़यंदा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात राज्यातून मिरचीची आवक बाजारपेठेत होत असल्याने आतापर्यंत तब्बल ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती आहे़ आगामी काळातही व्यवहार सुरु राहणार असल्याने यंदाचा मिरची हंगाम ७५ ते ८० कोटींपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे़ यंदा येथील परराज्यातील मिरची आवक मर्यादित असल्याने स्थानिक शेतकºयांच्या मिरचीला प्राधान्य मिळाले आहे़२०१३-२०१४ या वर्षात नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८ हजार ४०३ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-२०१५ या वर्षात ९७ हजार ५६९ क्विंटल़२०१५-२०१६ या वर्षात ८९ हजार ८०९ क्विंटल़२०१६-२०१७ या वर्षात २ लाख ६८ हजार क्विंटल़२०१७-२०१८ या वर्षात ६६ हजार ५९४ क्विंटल़२०१८-२०१९ या वर्षात १ लाख ५६ हजार ९८९ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-१५, २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षात मिरची आवक ही एक लाख क्विंटलचा टप्पाही पूर्ण करु शकली नव्हती़ या वर्षात प्रामुख्याने दुष्काळी स्थिती असल्याने शेतकºयांना लागवडीची अडचण होती़ यात रोपांच्या किमतीत वाढ झाल्याने लागवड खर्च वाढला होता़ परिणामी लागवड क्षेत्र घटून उत्पादनातही मोठी घट आली होती़ यंदा मात्र मिरचीची लागवड अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक असल्याने उत्पन्न वाढले आहे़बाजारात ओल्या मिरचीचे दर हे प्रतिक्विंटल चार हजाराच्या पुढे असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ लाली, व्हीएनआर, शंकेश्वरी या मिरचीची सर्वाधिक खरेदी होत आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार हे बाजारासोबतच पथारींवर सुरु असल्याने तेथील मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील १५ गावांमधील महिला आणि पुरुष मजूरांना तब्बल चार महिन्यांपासून मिरची हंगामातून रोजगार मिळत आहे़