शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दोन वर्षानंतर पावणे दोन लाख क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ यंदा मिरचीचे दरांमध्ये तेजी कायम राहिल्याने तसेच निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांकडून मिरची आवक अद्यापही सुरु आहे़ अद्याप महिनाभर हंगाम सुरु राहणार असल्याने दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोन लाख क्विंटलचा टप्पा सहजरित्या पूर्ण होणार आहे़गेल्या पाच वर्षात वेळोवेळी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता़ यातून हंगामात किमान तीन लाख क्विंटलपर्यंत होणारी मिरची आवक गेल्या पाच वर्षात निम्म्यावर आली होती़ यातून बाजारातील अर्थकारण डळमळीत शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात उदासिनता निर्माण झाली होती़ परंतू गेल्या वर्षात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने दमदार हजेरी दिल्याने मिरची पिकाला जीवदान मिळाले होते़ परिणामी आतापर्यंत मिरची उत्पादन सुरु असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात असून यामुळे दर दिवशी नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात २ हजार २०० क्विंटलपर्यंत सरासरी मिरची आवक होत आहे़ हंगाम संपण्यास महिन्याचा कालावधी असल्याने ही आवक दोन लाख क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे़ मिरचीला मिळालेला बुस्टर इतर व्यवसायांवरही परिणामकारक ठरत असून पावडर तयार करण्यासह परराज्यात निर्यात होणाºया कोरड्या मिरचीलाही चालना मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे़यंदा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात राज्यातून मिरचीची आवक बाजारपेठेत होत असल्याने आतापर्यंत तब्बल ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती आहे़ आगामी काळातही व्यवहार सुरु राहणार असल्याने यंदाचा मिरची हंगाम ७५ ते ८० कोटींपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे़ यंदा येथील परराज्यातील मिरची आवक मर्यादित असल्याने स्थानिक शेतकºयांच्या मिरचीला प्राधान्य मिळाले आहे़२०१३-२०१४ या वर्षात नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८ हजार ४०३ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-२०१५ या वर्षात ९७ हजार ५६९ क्विंटल़२०१५-२०१६ या वर्षात ८९ हजार ८०९ क्विंटल़२०१६-२०१७ या वर्षात २ लाख ६८ हजार क्विंटल़२०१७-२०१८ या वर्षात ६६ हजार ५९४ क्विंटल़२०१८-२०१९ या वर्षात १ लाख ५६ हजार ९८९ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-१५, २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षात मिरची आवक ही एक लाख क्विंटलचा टप्पाही पूर्ण करु शकली नव्हती़ या वर्षात प्रामुख्याने दुष्काळी स्थिती असल्याने शेतकºयांना लागवडीची अडचण होती़ यात रोपांच्या किमतीत वाढ झाल्याने लागवड खर्च वाढला होता़ परिणामी लागवड क्षेत्र घटून उत्पादनातही मोठी घट आली होती़ यंदा मात्र मिरचीची लागवड अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक असल्याने उत्पन्न वाढले आहे़बाजारात ओल्या मिरचीचे दर हे प्रतिक्विंटल चार हजाराच्या पुढे असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ लाली, व्हीएनआर, शंकेश्वरी या मिरचीची सर्वाधिक खरेदी होत आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार हे बाजारासोबतच पथारींवर सुरु असल्याने तेथील मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील १५ गावांमधील महिला आणि पुरुष मजूरांना तब्बल चार महिन्यांपासून मिरची हंगामातून रोजगार मिळत आहे़