शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

साडेसात हजार अवकाळी बाधितांना दोन कोटीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे़ यात नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला २ कोटी ४८ लाख रुपये येणार असून यातून साडेसात हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़यापूर्वी जिल्हा प्रशासलाने तीन हजार शेतकऱ्यांना १ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले होते़ अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ अशा एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाले होते़ यासाठी तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने घोषित केले होते़ पहिल्या टप्प्यात १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित होते़ गेल्या १२ दिवसांपासून या रकमेची प्रतिक्षा करण्यात येत होती़ शुक्रवारी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये मंजूर केले असले तरी सायंकाळपर्यंत प्रशासनात रक्कम आल्याचा संदेश प्राप्त झालेला नव्हता़ सोमवारी या संबधी कारवाई झाल्यास तात्त्काळ वाटपाला सुरुवात होणार आहे़ तालुकास्तरावर बाधित शेतकºयांच्या याद्या बँक खात्यांच्या माहितीसह तयार असल्याने तातडीने खात्यावर देण्याची कारवाई होणार आहे़

नव्याने मिळणाऱ्या निधीतून नवापुर तालुक्यातील ४३, शहादा १ हजार ५५९, अक्कलकुवा ३ हजार २५४ तर धडगाव तालुक्यातील २९०० शेतकरी असे एकूण ७ हजार ७३३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे़ विभागीय आयुक्तांकडून निधी प्रशासनाकडे आल्यानंतर तालुकास्तरावर दिला जाईल़ नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील एकाही लाभार्थीला नव्याने मिळालेल्या निधीतून रक्कम मिळणार नसल्याची माहिती आहे़